Friday, December 26, 2014

श्रीकबीरदर्शन

श्रीकबीरदर्शन - लेखक - डॉ. विजय बाणकर,  पृष्ठ संख्या - १६६,  मूळ किंमत - १६०/-  प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये १२० /- रू.  (उपलब्ध - १२/०१/२०१५ रोजी) आजच आपली प्रत नोंदवून ठेवा!
वर्ण, जात, पंथ वगैरे संकुचित देहनिष्ठ भावांच्या पलीकडे जाऊन ते अविभक्तपणें स्वरूपनिष्ठ जीवन जगत होते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना विचारल्या गेलेल्या नेहमीच्या प्रश्नांची त्यांनी दिलेली पुढील पारमार्थिक उत्तरे होय : एके दिवशी एका वनातून जात असता दुपारी ते एका झोपडीत गेले. तिथे रहात असलेल्या वीस-एक वर्षाच्या मुलीने त्यांना विचारले  -
    प्रश्न  :  आपण कोण बरे?
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमची जात?     
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमचा पंथ / संप्रदाय?
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमचे नांव?
    उत्तर  : कबीर.
या एकशब्दीं उत्तरांनी विस्मित होऊन ती मुलगी उद्गारते, ‘मी अनेक साधू पाहिले पण अशाप्रकारे उत्तरे देणारा मात्र आजपर्यंत कुणी भेटला नाही.   ‘दि मोस्ट ब्युटिफूल नेम्स म्हणून अल्लाची जी ९९ नावे जपली जातात त्यापैकी ‘अल् कबीर' हे एक विशेष नाम होय. कबीर म्हणजे  श्रेष्ठ, ग्रेट, उत्कृष्ट वा महान होय. ‘अणुरेणुहूनही लहान असलेल्या अशा आपल्या जीवाला स्वरूपाचे दर्शन घडून, संत श्रीतुकाराम म्हणतात त्याप्रमाणे, तो ‘आकाशाएवढा देवचि होऊन जातो तेव्हा तोे खरया अर्थाने ‘कबीर म्हणजे ‘महान' झालेला असतो, होतो. श्रीकबीर या अर्थाने महान झाले होते/होते. म्हणूनच त्यांना महात्मा म्हणूनही अनेकदा संबोधले गेले आहे.
‘ओवी ज्ञानेश्वराची, ‘अभंग तुकयाचा आणि ‘दोहा कबिराचा, हे समीकरण आता सर्वश्रुत होऊन गेले आहे. अर्थात, ‘तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदान्त वाहे पाणी।। हे अभंग विधान श्रीकबिरांच्याबाबतीतही सत्य आहे. श्लोक, ओव्या, अभंगांमधील विश्वकल्याणकारी ज्ञान श्रीकबिरांच्या दोह्यांमध्ये देखील अभिव्यक्त झाले आहे. उपरोक्त संतांच्या अभिव्यक्तीतही इतकी साम्ये आहेत, की सर्वच संत जणू श्रीकबीर गेले त्याच ईश्वर दिग्दर्शित वाटेवरून जात आहेत, असे वाटत राहते. (याप्रकारच्या अभ्यासपूर्ण नोंदीही काही विद्वानांनी करून ठेवल्या आहेत.) प्रस्तुत भावानुवाद व टिपा वाचताना अभ्यासू वाचकांना देखील तसे जाणवेल. कारण, दोह्यांचा अर्थ समजून घेत अनुवाद करताना श्रीज्ञानेश्वर तुकारामादी संतांचे सम विचार नुसते आठवतच नव्हते तर त्यातील अनेक शब्दही कळतनकळतपणे त्यात सामावून गेले आहेत. संत साहित्याचे सदैव संशोधन होत असते. भाविक जनतेकडूनही त्याचे मोठ्या प्रमाणात वाचन/गायन/पारायण होत असते. श्रीकबिरांच्या दोह्यांचे गद्य, पद्य अनुवादही उपलब्ध आहेत. असे असतानाही त्यांच्या दोह्यांचा भावानुवाद करावयाचे मनाने घेतले याचे एकमेव कारण, श्रीज्ञानेश्वरादी संतांनी आधी केलेल्या व मग सांगितलेल्या ‘खरया भक्तिबाबत व खरया देवाचे दर्शन घडविण्याबाबत मार्गदर्शक असणारया, माझे गुरुदेव श्रीहंबीरबाबा यांनी लिहिलेल्या ‘जीवनकलेची साधना' या धर्मग्रंथाचा इंग्रजी अनुवाद करताना त्यांनी त्यात उद्धृत केलेल्या संत श्रीकबिरांच्या दोह्यांचा झालेला अभ्यास, हे होय.

Monday, November 17, 2014

टर्मिनस- अस्वस्थ करणार्‍या ताज्या गूढकथा

मराठी ललित साहित्याला विशेषत: कथा-कादंबर्‍यांच्या प्रांतात थोडी मरगळ आलेली आहे की काय अशी वाटणारी आजची परिस्थिती.  त्यातच गूढकथा-विज्ञानकथा आदी आधीच दुर्लक्षित  साहित्यप्रकारांमध्ये लेखणी आजमावणारे नवोदित लेखक सापडणं दुर्मिळच. अशा काळात  अभिषेक अनिल वाघमारे या नवोदित लेखकाने आपल्या टर्मिनस या पहिल्याच कथासंग्रहाद्वारे गूढकथांच्या या प्रांतात दमदार पाऊल टाकले आहे.
      हा कथासंग्रह छोटेखानीच असला तरी त्यातील एकंदर दहा कथा या परस्परांपासून वेगळ्या आहेत. येथे सरसकट सगळ्या कथांना गूढकथा जरी म्हटलं असलं तरी त्या रूढार्थाने तशा नाहीत.  उदा. सर्किट व पाऊलखुणा या विज्ञानकथा या सदरातही मोडू शकतात. तर, ऑब्जेक्ट्स इन द मिरर...’, खोळ यासारख्या कथांना एक सामाजिक अंग देखील आहे. चूक ?’ आणि टर्मिनस या कथा तत्वज्ञानाचे चिंतन करणार्‍या आहेत तर सुरकुत्या’,  काचेचे ग्लास या कथा कुटुंबकथेच्या वाटेने जाणार्‍या गूढकथा आहेत.

      शैलीदार लेखन कमी झाल्याच्या काळात वाघमारे स्वत:ची वेगळी शैली निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. मांडणीतील सुटसुटीतपणा, एक मिष्किल विनोदाचा अंडरकरंट ,मध्येच पेरलेली चमकदार वाक्ये उदा. गरज ही गरज असावी, तिला भावनेची फोडणी दिली म्हणजे दोन्ही नासतात’; लुगडं काही विटत नाही अन् जीव काही आटत नाही’; सवय कुणाला गुलाम करून घेताना काही भेदभाव करत नाही इ. अशी एक नवीनच शैली लेखकाने आपल्यासमोर मांडली आहे.  कथाविषयांची निवड व त्याला सुसंगत निवेदन , विषयापासून न भरकटण्याची हातोटी, आवश्यक तेथे धक्कातंत्र, निरीक्षणातून आलेली चित्रमय मांडणी आदी वैशिष्ट्यांमुळे या कथा वाचकाला बांधून ठेवण्यात यशस्वी होतात. बर्‍याच कथांचे शेवट हे लेखकाने  स्वत: स्पष्ट न करता  वाचकांवर सोपवल्यामुळे कथा एक वेगळी पातळी गाठतात उदा. शोध पाउलखुणा , चूक ?’ इ.

काही कथांमधून लेखकाचे नवखेपण जाणवत असले तरी एकंदर कथाकथन व लेखनाच्या तंत्राशी लेखकाचा चांगला परिचय आहे हे जाणवते. त्यामुळे कथेच्या गरजेप्रमाणे लेखक भाषेला वळवताना दिसतो.  उदा. चूक?’ व टर्मिनस यासारख्या तत्वज्ञानप्रधान कथांची थोडीशी जड वाटणारी भाषा जी.ए. कुलकर्णींची आठवण करून देते तर ऑब्जेक्टस इन द मिरर व सर्किट या कथांमधून आधुनिक जगाची भाषा लेखकाने वापरली आहे.

या संग्रहातील काही कथा या यापूर्वी काही नियतकालिके उदा. नागपूर तरूण भारत व काही दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे शब्दसंख्येवर आलेली बंधने काही ठिकाणी जाणवतात. म्हणूनच कदाचित या लघुकथा असल्या तरी कथांची लांबी एक सारखी नाही. पण त्यामुळे कथाविष्कारात फारसा फरक पडतो असे वाटत नाही. लेखकाचे हे पहिलेच पुस्तक असले तरीही पुस्तकाला लेखकाची स्वत:ची किंवा कुण्या ज्येष्ठ साहित्यिकाची आशीर्वादपर प्रस्तावना नाही हे आजच्या स्वस्तुतीमग्न लेखकांच्या युगात उल्लेखनीय म्हणावे लागेल. जोडीला राज जैन यांचं मुखपृष्ठही पूरक व लक्षवेधी आहे.  मुद्रितशोधनात मात्र अजून परिश्रम घेण्याची गरज होती.

आज दूरचित्रवाणी, चित्रपट, साहित्य याद्वारे सर्वत्र सोपं, पचायला हलकं असंच आपल्या पानात वाढण्यात येत असताना अभिषेक वाघमारेंचं हे थोडं गंभीर , वाचकाला थोडं विचार करायला लावणारं तरीही रंजक असं लेखन नक्कीच वाचनीय झालं आहे. बौद्धिक रंजनाच्या शोधात असणार्‍या चोखंदळ वाचकांनी तर नक्कीच वाचावं असं हे पुस्तक. आपल्या या दमदार आगमनाने अभिषेक वाघमारेंनी यापुढे वाचकांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढवल्या आहेत हे नक्की. 


पुस्तकाचे शीर्षक: टर्मिनस
लेखक: अभिषेक वाघमारे
पृष्ठसंख्या: ८८
किंमत: रू. १००/-


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Saturday, September 13, 2014

What an idea sirji!!!

ऐन गणपतीत आजारी पडल्याने गौरी साठी माहेरी येणे झालेच नव्हते. तेव्हा म्हटले आता बरे वाटत आहे माहेरी जाऊन यावे. यावेळी मुहूर्त निघाला तो संकष्टीचा, भाद्रपदातली संकष्टी म्हणजे साखर संकष्टी आमच्याकडे हिला साखर चौथ असे हि म्हणतात. ह्या साखर चौथीला हि आमच्या भागात गणपती बसतात. मामाकडे गणपती  बसत असल्याने माझ्या माहेरी येण्याच्या मुहूर्ताचा फायदा झाला, श्रींचे दर्शन हि झाले आहे सगळ्यांची भेटही झाली. साहजिकच आहे भेट झाली म्हणजे गप्पा होणार आठवणी उजळल्या जाणार अशीच एक गावातील मामांची आठवण निघाली आणि आम्ही खरच म्हणावे लागले What an idea sirji!!!

गणपती घरी येणार म्हटले कि सजावट आलीच सजावट म्हणजे मखर बनवण्यासाठी थर्माकोलचा प्रामुख्याने वापर आणि गणेश या मखरात विराजमान झाले कि अखंड जळणाऱ्या समया आणि अगरबत्ती.
पूर्वी लहान अगरबत्ती यायची त्यामुळे कोणाला न कोणाला सतत तेथे राहावे लागायाचे मग कुणीतरी अक्कल वापरून मोठ्या अगरबत्त्या मार्केट मध्ये आणल्या त्यावेळी त्या खूप महाग असल्याने रात्रीच लावल्या जायच्या आपण झोपल्यावर देखील अगरबत्ती चालू राहावी हा उद्देश.

पण अशा अगरबत्त्या म्हणजे थर्माकोलच्या मखराला धोका कारण कुठे जरा अगरबत्ती हलली तर ती सरळ मखराला टेकणार आणि मग ...........

घरी गणपती असताना एका रात्री साधारण ९ किंवा १० च्या सुमारास माझ्या वडिलांच्या नात्यातील मामा (आम्ही यांना मामाच म्हणत असू) घरी गणपती दर्शनाला आले. त्यावेळी मी हि मोठी अगरबत्ती लावण्याच्या प्रयत्नात होते.
“बाय नीट लाव अगरबत्ती, नाय तर टेकवशील मखराला”  इति मामा आजोबा
“नाही आजोबा नीट लावते मी, भाऊ प्रसाद दे रे आजोबाना” असे म्हणून मी विषय संपवला
“अरे मामा ये, इतक्या रात्री आलास?” वडिलांनी स्वागत केले.
“अरे वेळच भेटत नाही, कामावरून आलो आज ठरवलंच उशीर झाला तरी चालेल आपले ४-५ घर आहेत तिथे दर्शन करायला गेलेच पाहिजे म्हणून निघालो.” हुश्य हुश्य करत आपली कथा ऐकवली. आम्ही मध्येच “प्रदीप, तू एवढ्या मोठ्या अगरबत्त्या कुठून आणल्यास? मखराला चिकटली म्हणजे?” म्हणून चौकशी केली.
“रात्रभर अगरबत्ती जळावी म्हणून आणल्या आहेत, आपल्या उरणला तो गणपती चौकात नाही का अगरबत्तीवाला बसतो त्याच्याकडून.” वडिलांनी माहिती पुरवली.
त्यावर लगेच मामा चालू झाले “ आमचा दिनेश पण म्हणत होता कि आणूया मोठ्या अगरबत्त्या पण मी नको बोललो आणि त्याऐवजी त्याला “कासवछाप” (पूर्वी मच्छर अगरबत्तीला याच नावाने ओळखायचे आता गुड नाईट नावाने ओळखतात) आणायला सांगितली.”
त्यावर दादांनी (माझे वडील) म्हटले “हो, ह्या पावसाच्या जमा होणाऱ्या पाण्यामुळे मच्छर वाढलेत...” त्यांचे वाक्य अर्धवट तोडत मामा म्हणाले “ म्हणूनच सांगितली, ती कशी गोल आणि चापटी येते, सोबत तिचा stand पण येतो त्यामुळे मखराला धोका नाही, ती लावली आपल्याला मच्छर पण लागत नाही आणि हि केळी वगैरे फळे ठेवलेली असतात त्यामुळे येणारी चिलटे पण पळता, म्हणून मी रात्री देवापुढे सरळ ‘कासवछाप मच्छर अगरबत्ती’ लावतो!”

ह्यावर दादा “मच्छर अगरबत्ती?” आणि पुढे आम्ही सगळेच खो-खो हसू लागलो.
त्यावर मामांचा युक्तिवाद असा कि “देवाने कुठे सांगितले आहे मला सुवासिकच अगरबत्ती हवी आहे?”

हे हि बरोबरच आहे म्हणा.  “What an Idea Sirji!!”


आज ते मामा आजोबा नाहीत पण त्यांची हि Idea आम्ही कित्येक पिढ्यांना देऊ शकू.....

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐
 ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, September 09, 2014

महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स

पुस्तकाचे नाव - महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स

लेखकाचे नाव - सुनील पोटेकर

प्रकाशक - शब्दांजली प्रकाशन -पुणे. (संपर्क - ९२७०१०८०८०)

किंमत - रु.१२० /-


महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स या पोर्टलवर ‘ई-संस्कृती' या सदरात सुनीलचे महाराष्ट्र राज्यातल्या ई- क्षेत्रात अंमलबजावणी झालेल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या लोकांसाठीच्या योजना आणि त्यांची सोप्या भाषेतली आवश्यक अशी माहिती सुनील पोटेकरांनी या पुस्तकातून अतिशय सोप्या भाषेत पोहोचवण्याचे काम केलं आहे. भारत सुपर पॉवर झाला पाहिजे आणि भारतानं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हा वापर जास्तीत जास्त तळापर्यंत झाला पाहिजे, पोचला पाहिजे. लोकांसाठी, लोकांना उपयुक्त असं जे जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजेच. पण त्याच बरोबर तांत्रिकदृष्ट्या त्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरणं, हाताळण अवघड वाटत असेल , तर त्यासाठी त्यांना तयार केलं पाहिजे. त्यांना त्याची सवय लावली पाहिजे. गरज ही शोधाची जननी म्हणतात त्याप्रमाणेच काम व्हायला हवं. मोबाईल आला आणि तो अगदी तळागाळापासून ते डोंगरकपारीपर्यंत सर्वच ठिकाणी जिथे म्हणून माणूस आहे, तिथंपर्यंत जावून पोचला ना! याचं, कारणच तात्काळ स्वाम्दाची गरज तर होतीच, पण तंत्रज्ञानानं ही गोष्ट साध्या करून दाखवली. त्याच प्रमाणे आज सरकारच्या अनेक योजना जनतेसाठी निघतात, नवनवीन योजना तयार होतात, पण त्याची माहिती किती लोकांपर्यंत पोहोचते? किती जण त्या योजनांचा लाभ घेतात? त्यात ही माहिती जरा इंटरनेटवर येऊ पाहत असेल, तर इंटरनेटच मुळी किती लोक वापरतात? मनाला पडणारे हे सगळे प्रश्न खूपच महत्वाचे आहेत. पण त्याच बरोबर इंटरनेट सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांनी ते वापरावे यासाठी तळापर्यंतच्या लोकांपर्यंत ई-साक्षरता पसरवणे खूप महत्त्वाचे आहे, आणि ई-साक्षर होत असताना प्रत्येकाला त्या मार्गावरच्या अडचणी दूर करण्यासाठी सुनीलसारखी माणसं विचार करत असतात. सुनीलच्या या पुस्तकाने लोकांचं काम खूपच सोपं झालं आहे. खरोखरचं हे पुस्तक घरोघरी असणं आवश्यक आहे. कारण या पुस्तकातून प्रत्येकाला हवी ती योजना, त्याचे लाभ, त्याची माहिती सारं सारं इंटरनेटवर कसं बघायचं हे सांगितलं आहे, त्यामुळे कम्प्युटरची, इंटरनेटची भीती चमत्कार करावा तशी सुनीलनं पळवून लावली आहे.
    सुनीलच्या पुस्तकात विश्वकोशानं सुरुवात झाली आहे. विश्वकोश कुठल्याही शुल्काविना इंटरनेटवर कसा उपलब्ध आहे आणि तो कसा पाहायचा या विषयीही माहिती हे पान वाचकांना सांगतं. तसंच प्रत्येक व्यक्तीचं आपलं स्वत:चं घर असावं असं स्वप्न असतं. हे स्वप्न पूरम होताना सर्वसामान्य लोकांचा संबंध मुद्रांक आणि नोदंणी कार्यालयाशी येतो. मालमत्तेच्या खरेदी-विक्री संबंधात कागदपत्रांची  नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी होत असते. आय-सरिता नावाचं त्याचं पोर्टल कसं बघायचं हेही या पुस्तकात समजावून सांगितलं आणि दाखवलं आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यासंबंधीची सर्व माहिती दिलेल्या संकेतस्थळावर मिळू शकते. अपंगासाठीचंही पोर्टल इथे बघायला मिळतं. आधार कार्ड कसं काढायचे? याचीही माहिती इथेच एका पेजवर मिळते. आरोग्याच्या संबंधाबाबत आशा स्वयंसेविका योजना यांच्याविषयी माहिती सांगणारं पानही इथे बघायला मिळतं. ई-रिक्रुटमेंट पासून अनेक कामं या संकेतस्थळाला भेट देऊन कमी वेळात करता येतात व ती कशी करावी याची माहिती कळते. सुनीलने अशा ३० प्रकारच्या योजना, प्रकल्प या पुस्तकातून लोकांसमोर आणल्या

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Friday, September 05, 2014

जन्म शाळेचा

परीक्षा तुझ्यासारख्या पोरांनी द्यायच्या नसतात. तुमची औकात तरी आहे काय रे शाळेत शिकायची. म्हणे परीक्षेला का बसून देत नाहीत.” एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक आपल्या शाळेतील विद्यार्थ्याला झापत होते.
“पुन मना ६० % परल्न मागचे सामाईन” तो विद्यार्थी खाली मान घालून आपल्या सरांना आपली योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करत होता.
“तुझ्या बापाला येऊन भेटायला सांग, त्याला सांगतो मी तुला किती मार्क पडलेत ते.....” इति मुख्याध्यापक
*******************

“मास्तर येऊ का?” एक शेतकरी वेशातील माणूस उभा होता.
“कोण रे तू ?” मुख्याध्यापक गरजले
“मी ते बोकडवीरा गावांशी पाटील, पोराला काल निरोप दिल्ताव म्हन्गुन आलतू” तो शेतकरी म्हणाला
“हं..” एखाद्या तुच्छ किड्याबरोबर बोलावे तसे ते मुख्याध्यापक बोलत होते. “तुझ्या पोराला परीक्षा द्यायची आहे तेव्हा 2 पोती तांदळाची माझ्या घरी पाठवून दे, तर तुझ्या पोराला परीक्षा देता येईल, नाहीतर नाही समजल?”
“बर मास्तर, देतो पाठवून” आपल्या पोराच्या भविष्यासाठी कोणताही वादविवाद न करता त्याने ते कबुल केले.
त्याच शेतकऱ्याची नाही तर संपूर्ण महालणातल्या (महालण तालुक्यातील १२ गाव म्हणजे एक महालण) घराघरात हीच परिस्थिती होती. ह्या महालणाचा एकाच देव तो म्हणजे वाजेकर शेठ.

*****************************

सगळे शेतकरी वाजेकर शेठला भेटायला आले “शेट, कयतरी करा तो किंद्रे मास्तर आपले पोरांना परीक्षा नय देऊन देय, कोणाला ४ पोती, कोणाला ३ पोती, २ पोती अस चावूल त्याचे घरा पोचवला सांगतय, अस चावूल दिला तर खावाच काय? आणि दिलं नय तर पोरांना शिकू नय देवाचा तो.......
हाच तो क्षण जिथे महालण हायस्कूल म्हणजेच तू. ह. वाजेकर हायस्कूल चा जन्म झाला.....

*****************

वाजेकर शेठ घरी आले आणि आपल्या जावयाला भेटले व सगळी कथा सांगितल्यावर विचारले “जनार्दन, कस करायचं रे पोरांचं भविष्य टांगणीला आहे. काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. तू पोरांना शिकवू शकतोस का?”
“शिकवायला मी शिकवेन पण शाळा सुरु कशी करायची?” जनार्दनने आपल्या सासऱ्याना प्रतिप्रश्न केला.
“त्याची चिंता तू नको करू मी माझ्या ओळखी वापरतो. त्यावेळी वाजेकर शेतकरी कामगार पक्षात होते आणि एन. डी. पाटील (रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत) हे हि शेतकरी कामगार पक्षात होते. त्यामुळे त्यांनी वाजेकर व रयत शिक्षण संस्था सातारा यांचा संवाद घडवून आणला व येथे उरण येथे गरीब मुलांसाठी शाळा काढावी हि विनंती केली. ती विनंती लगेच मान्य झाली. तुम्ही जागा द्या आम्ही लगेच शाळा काढतो. म्हणून वाजेकरांकडे निरोप आला.

*****************

MSEB (त्यावेळी MSEBच होते आता ते maha-GENCO म्हणून ओळखले जाते) बोकडवीरा चे पदाधिकारी “नमस्कार पाटील साहेब, तुमचे नवीन घर पूर्ण झाल्याचे कळले, एक काम होते. आपल्याला MSEB साठी ऑफिस करायचे होते. तुम्ही तसंही मुंबईला राहता तेव्हा गावाचे घर भाड्याने दिलेत तर बरे होईल.... आम्ही महिना ३०००/- भाडे देऊ (१९६३ साली MSEB ने हि रक्कम ऑफर केली होती.) किमान 2 ते ३ वर्षासाठी हवे आहे  तोपर्यंत MSEBची इमारत तयार होईल, भाडे वाढवून हवे असेल तर ६ महिन्याने वाढवू आपण, बघा विचार करा.”
“भाडे ठीक आहे पण मला येथे महालणातल्या मुलांसाठी शाळा चालू करायची आहे, त्यामुळे मी तुम्हाला जागा देऊ शकत नाही असे स्पष्टपणे सांगून ती ऑफर नाकारली.

आणि ६ जून १९६४ साली इयत्ता आठवीचा वर्ग सुरु करून महालण सभा विद्यालयाच्या शुभारंभाचा श्रीफळ वाजेकरांच्या हस्ते श्री जनार्दन पाटील बोकडवीर यांच्या घरी फोडला गेला व शाळा सुरु झाली. आणि किंद्रे मास्तरांच्या जाचातून मुलांची सुटका झाली. गावात ७ वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा होती तेव्हा त्यामुळे आठवीचा वर्ग सुरु केला गेला. पुढे पुढच्या वर्षी ९ वी चा वर्ग गावाच्या देवळात भरला परंतु दहावीचा वर्ग कुठे भरवणार ह्या प्रश्नाने डोक वर काढायला सुरुवात केली.

एका मोठ्या जागेचा शोध सुरु झाला आणि ह्या १२ गावातील ‘फुंडे’ या गावाने हा प्रश्न आपली जमीन शाळेसाठी दान देऊन सोडवला. पण बांधकाम करायचे म्हणून कामावर जाणाऱ्या प्रत्येकाला शाळेच्या कामासाठी श्रमदान करणे सक्तीचे केले. तसेच पैसे उभे करण्यासाठी कार्यक्रम केले जायचे त्यासाठी तिकीट हि प्रत्येकाला सक्तीची केले होते.

पैसे उभे करण्यासाठी वाजेकर मोठ्या लोकांना जाऊन भेटायचे व त्यांचे कार्यक्रम ठरवायचे यातच संगीतकार कल्याणजी आनंदजी यांचाही कार्यक्रम झाला. प्र. के. अत्रेंनी तर आपले नाटकाचे प्रयोग करण्याची परवानगी दिली व मला कोणतेही मानधन देऊ नका गरज नाही ते पैसे शाळेसाठी वापरा म्हणून सांगितले. अशा प्रकारे 10 वीचा वर्ग आला तेव्हा तेथे ३ खोल्या उभारल्या गेल्या होत्या व हळू हळू शाळा आणि तिची इमारत वाढवली गेली.

१९८१ साली वाजेकर गेल्यावर त्या शाळेला नाव “तू. ह वाजेकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे” असे नामकरण करण्यात आले. मी स्वत ह्याच शाळेत शिकले आम्ही जेव्हा या शाळेत शिकायला गेलो. तेव्हा कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय हि सुरु झाले होते. आज ह्या शाळेत तुम्ही ५ वी साठी प्रवेश घेतला तर किमान कला, विज्ञान, वाणिज्य या डिग्री पर्यंत  शिक्षण घेता येते. आज या शाळेला 50 वर्ष पूर्ण झालीत (१९६४ ते २०१४).

मी गर्वाने सांगू शकते कि ज्या जनार्दन पाटीलांच्या घराचा उल्लेख झाला ते माझ घर आहे त्या घरात माझे सगळ बालपण गेल. ते जनार्दन पाटील माझे आजोबा आणि तू. ह. वाजेकर माझे पणजोबा आहेत. तुम्हा दोघांना हि धन्यवाद तुम्ही शिक्षक नाही झालात पण महालणातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक मिळवून दिलेत. फुंडे ग्रामस्थांनी कोणताही मोबदला न घेता जमीन दान दिली आज त्या जमिनीची किंमत काही कोटी रुपयात आहेत. तुमचे उपकार विसरता येणार नाही तुम्ही नसतात तर आजही कुठल्यातरी शाळेचा मुख्याध्यापक आमची औकात काढत असता आम्ही आम्ही खाली मान घालून उभे राहून ऐकत असतो.






Saturday, August 30, 2014

मोदक

“अग प्रतिभा, इकडे बघ अशा पाकळ्या आल्या पाहिजेत मोदकाला.” सासूने आपल्या नवीन लग्न होऊन आलेल्या आणि मोदक न येणाऱ्या सुनेला फार पेशन्सली सांगितले “एक काम कर तू हा पिठाचा गोळा घे आणि माझ्यासारखा मोदक तयार करायचा प्रयत्न करत रहा.” 
“हो आई!” सुनेने खालमानेने उत्तर दिले. 
सुनेला त्या मोदकाच्या पाकळ्या जमेपर्यंत सासूचे २१ मोदक झालेले असतात. “आई, तुमचे मोदक झाले आणि मला एक पण बनवता आला नाही.” हिरमुसल्या आवाजात सुनेने वाक्य म्हटले 

“अग असुदे, पुढच्या संकष्टीला प्रयत्न कर, काय फरक पडतो.” सासूने तितक्याच स्पोर्टिंग स्पिरीट मध्ये कोणताही टोमणा न देता तिला समजावले.
अशाच तीन चार संकष्ट्या गेल्यावर “आई बघा जमला मोदक” सुनेने असेच म्हणताच, “आरे वाह! जमला ग, आता दुसरा कर” सासूने आनंदाने सांगितले. 


“प्रतिभा, मोड तो मोदक, एक जमला पण...” सासूचे वाक्य अर्धवट तोडतच सुनेने विचारले “पण काय आई?” सासूने हसतच उत्तर दिले “अग, हा मोदक बघ आणि आत्ता तू बनवलेला मोदक बघ, एक लहान एक मोठा कसे चालेल, सगळे मोदक एक सारखे दिसले पाहिजे. आणि तो मोदक फोड आणि सारण कढाईत टाक आणि ते पीठ मात्र बाजूला ठेव ते मिक्स करू नकोस.” सासूने आधीच्याच पेशन्सने सांगितले. आज्ञाकारी सुनेने लगेच तसे केले आणि दुसरा मोदक तयार करायला घेतला. गणपती येऊन गेले पण इंडिपेंडन्टली करता येत नव्हते पूर्ण २१ मोदकात ३ किंवा ४ मोदक इतकेच मोदक असायचे. सुनेला मोदक जमावे म्हणून प्रत्येक संकष्टीला मोदक करायचा घाट घातला जायचा. आणि ९ किंवा 10व्या संकष्टीला २१ मोदक सासूचे ६ ते ७ मोदक होते आणि उरलेले सुनेचे...... सुनेने मोदक तयार केले म्हणून अत्यानंद झालेला.


गावातून मुंबईत आलेल्या आणि भात, भाकरी (तांदळाची), कालवण आणि भाजी याखेरीज कोणताही पदार्थ न येणाऱ्या सुनेला मोदक, पुरणपोळी, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, करंज्या, शंकरपाळ्या यासारखे प्रत्येक सणाला बनणारे, नॉर्मल जेवणात बनणारे सगळे पदार्थ पेशन्स ने शिकावेले आणि तोच पेशन्स हि सुनेला शिकवला. आज ती सासू नाहीये ती सून आहे आपल्या सून कधी येईल याची वाट बघते आहे.... पण सून येण्यापूर्वी तोच पेशन्स तिने तिच्या लेकीवर देखील वापरला ““अग बाय, कार्टे! इकडे बघ अशा पाकळ्या आल्या पाहिजेत मोदकाला. नाहीतर सासरी माझ्या नावाचा उद्धार होईल. लेकीला मोदक पण करायला शिकवले नाहीत.” 


“तुझ्या सासूने कधी तुझ्या आईचा उद्धार केला होता का तुला मोदक येत नव्हते म्हणून?” इति तिची लेक म्हणजे मी. “बाय सगळ्याच सासवा माझ्या सासुसारख्या नसतात” इति ती सून.


वेल ती सासू म्हणजे माझी आजी होती ती सून म्हणजे माझी आई आणि बाय म्हणजे मी (आमच्या मातोश्री आम्हाला बाय म्हणतात कधी कधी. सो आई तुझ्या आणि तुझ्या सासुसारख्या मोदकाच्या पाकळ्या जमल्या नाहीत पण केलेत ट्राय मी मोदक.....



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, July 27, 2014

"मेरे बारेमें इतना मत सोचो, दिल मे आता हुं, समज मे नही| "

"मेरे बारेमें इतना मत सोचो, दिल मे आता हुं, समज मे नही| " आज सलमान खान चा 'किक' हा नवीन चित्रपट बघितला कथानक ठीकठाक असले तरी उत्तम सादरीकरण आणि सिनेमॅटोग्राफी असल्याने चित्रपट बघण्यालायक झालेला आहे. 
कोणत्याही गोष्टीत "किक" असल्याशिवाय काम करायचे नाही अशा Devi Lal Singh (सलमान खान) ला शेवटी "किक" लहान मुलांच्या उपचारांसाठी Devil बनून चोरी करत असतो आणि रणदीप( इन्स्पेक्टर ) शेवट पर्यंत त्याच्या मागावर असतो सलमान खान चोर आहे हे कळूनही काही करता येत नाही ...........
शेवट तर अनएक्स्पेक्टेड आहे.........

रणदीप आणि Jacqueline यांचे काम उत्तम, सलमान @ his best मला तरी चित्रपट अतिशय उत्तम वाटला आहे.

त्यात राजे नी चित्रपट बघायला येण्यासाठी नकार दिल्याने Vinita aani Amey यांच्या सोबत चित्रपट बघितला (Raj न आल्याबद्दल धन्यवाद!) आम्हा तिघांना चित्रपट enjoy करता आला . आज विनिता सोबत गेल्याने मित्र मैत्रिणीसोबत बघितलेले चित्रपट आठवले सलमान च्या प्रत्येक entry ला शिट्या action सीन ला आवाज, टाळ्या बिनधास्त करत होतो. एकूण चित्रपट आणि आजचा दिवस एकदम ग्रेट



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

पिनकोड ..............

मी: Hello, नमस्कार मी पुस्तकजत्रा मधून बोलते. आपण...
पलीकडून ग्राहक : हा बोला (माझे वाक्य अर्ध्यात तोडत)
मी: आपण पुस्तकजत्रावर फलाना पुस्तकाची ऑर्डर दिली होती, तर तुमचा पत्ता कन्फर्म करायचा होता 
ग्राहक: पत्ता तिकडे दिलेला आहे....
मी: आहो तोच कन्फर्म करायचा आहे. (मी पत्ता वाचून दाखवला)
ग्राहक : बरोबर आहे! 
मी: तुमचा पिनकोड सांगता का ?
ग्राहक: पिनकोड?
मी: हो कारण पिनकोड च्या जागी तुम्ही "१२३४५" असे लिहिले आहे.
ग्राहक: तुम्ही तिथे "पिनकोड" लिहायच्या ऐवजी "पोस्टकोड" लिहिले होते मला कसे कळणार, तेथे "पिनकोड" लिहायचा आहे
मी: Sorry, पिनकोड देताय न?
ग्राहक: घ्या लिहून ४१ (बाजुच्याला आवाज देत) अरे आपला पिनकोड काय आहे.
मी: इट्स ओके, मी नेट वरून घेते. Thank u
ग्राहक : आधीच नेट वरून घायचा ना! ( फोन कट करताना पलीकडून कानी पडलेला आवाज)

तेव्हा Mr. Raj Jain आता तरी तो "पोस्टकोड" शब्द बदलून "पिनकोड" करा हो कृपया!!



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐
 ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Friday, July 11, 2014

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ९

 बऱ्याच महिन्याने पुन्हा एकदा भारतच्या इतिहासातील एक हिरा समोर आणत आहे. त्या म्हणजे जैतपूरची राणी, आपल्या इतिहासात त्यांचे नाव पण नोंदवलेले नाही. त्या म्हणजे  बुंदेलखंड प्रांतातील जैतपूरचे राजा परीक्षित यांच्या पत्नी म्हणजेच जैतपूरची महाराणी जिला “जैतपूरची राणी” म्हणूनच ओळखल जातं. १८४९ सालापासून चालू असलेल्या शीत युद्धाला राणीने मूर्त स्वरूप देऊन ब्रिटीशांची पळता भुई थोडी केली.
पुर्वतिहास
बुंदेलखंड प्रांतातील जैतपूर हे छोटेसे संस्थान राजा परीक्षित यांच्या नेतृत्वाखाली राज्य करत होते. जैतपूर संस्थान म्हणजे बुंदेलखंड राज्याचे राजे छत्रसाल यांच्या मृत्युनंतर बुंदेलखंड राज्यातून फुटून निर्माण झालेल्या ५ छोट्या राज्यांपैकी एक होते. आणि लॉर्ड डलहौजी च्या हडपनिती अंतर्गत  ब्रिटीशांनी आपली मैत्रीची भूमिका मांडली पण राजा परीक्षित हे स्वतंत्रता प्रेमी होते व त्यांना हि मैत्रीपूर्ण नजरकैद मंजूर नव्हती पण ते कंपनीच्या तुलनेत राजेसाहेबाकडे कमी सैन्य होते याचाच फायदा लॉर्ड एलनबरो  यांनी घेतला आणि २७ नोव्हेंबर १८४९ मध्ये संस्थानावर ताबा मिळविला व राजा परीक्षित यांना पळवून लावले आणि आपल्या समर्थक असलेला राजा सामंत यांचा राज्याभिषेक केला. आपली हार झाली व एका फितुराचा राज्याभिषेक करण्यात आला हे गोष्ट सहन न होऊन राजा परीक्षित यांचा मृत्यू झाला.
संग्राम
राजा परीक्षित यांच्या मृत्युनंतर सारी सूत्रे त्यांच्या पत्नीने आपल्या ताब्यात घेतली, त्याच वेळी राणीला ब्रिटीशांकडून शरणागती पत्करण्यासाठी खलिते येऊ लागले होते, राणीने त्या खलित्यांना भीक घातली नाही. प्रत्यक्षात तिने शरणागती पत्करली नसली तरी ति शांत झाली होती. ब्रिटीशांना आपल्या प्रांतातून उखडून टाकण्यासाठी ति फौजा गोळा करत होती  शाहगढ प्रांतामध्ये तिला आश्रय मिळाला. तिने आपल्यासाठी तर फौजा गोळा करत असतानाच तिने ब्रिटीशांच्या विरोधात छोट्या –मोठ्या कारवाया चालूच ठेवल्या होत्या. शाहगढ, बानपूर सारख्या प्रांतात तिने ब्रिटीशांच्या विरोधात क्रांती ज्योत पेटवली. तसेच जैतपूर भागातील इतर ठाकूर राजपूत यांच्यात हि तिने क्रांतीज्योत पेटवण्याचे कार्य चालू ठेवले तोपर्यंत इकडे स्वतंत्र संग्रामाचे लोण पोहोचले.

प्रत्यक्ष संग्रामाची सुरुवात
 १९ जुलै १८५७ रोजी राणी ने स्थानिक ठाकुरांच्या मदतीने ब्रिटीशांनी ताबा मिळवलेल्या आपल्याच राज्यावर हल्ला केला, जैतपूरच्या ब्रिटीशांनी घोषित केलेल्या राजाचे धाबे दणाणले, पण कर्नल Liddell याने युद्धाची बाजू सांभाळली.
आपल्या तयार केलेल्या फौजेसह राणीने दोन महिने कडवी झुंज देत, राणीच्या मदतीला मावा, बानपुर आणि शाहगढ़ इथले राजेही आले आणि  कर्नलला पळवून लावले जैतपूर वर पुन्हा एकदा ताबा मिळविला, तसेच तेथील तहसीलदाराच्या कार्यालयावर व तेथील खजिन्यावर ताबा मिळविला. परंतु ब्रिटीशांनी हि हार सहजासहजी पत्करली नाही, जनरल Withlobk आणि ब्रिगेडियर Munsey यांनी पुन्हा एकदा ताज्या दमाच्या सैनिकांसह १० ऑक्टोबर १८५७ रोजी जैतपूरवर हल्ला केला.
राणीने माघार न घेता आपली झुंज चालू ठेवली, एक स्त्री निकराने ब्रिटीशांबरोबर लढत होती पण फितुरीचा शाप पाचवीलाच पुजलेला असल्याने, सामंत तसेच चरखेरीचे राजा यांनी आपले संस्थान ब्रिटीशांचे असलेले मैत्रीपूर्ण संबध कायम राहावे म्हणून राणीची बाहेरच्या संस्थानकडून येणारी रसद तोडली तसेच राणीबरोबर युद्ध हि चालू केले सर्वच आघाड्यांवर लढावे लागत असल्याने अखेर राणीची पीछेहाट होऊ लागली, तिला जैतपूर सोडून पळून जावे लागले. ति टिहरी ठाण्याच्या दिशेने निघाली परंतु ब्रिटीश सैन्याने तिला पकडले व तिला आजन्म कारावासाची शिक्षा दिली. परंतु राणी फार काळ त्या कारावासात राहिली नाही पकडले गेल्यानंतर लगेच ४ महिन्यात तिला मृत्यू आला.

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, June 30, 2014

स्वप्न कि सत्य!

काल रात्री अचानक वीज कडकडाट झाला, अगदी झोपमोड होईपर्यंत मोठा आवाज, मनात म्हटलं “राजेंची सटकली काय?” उठून बघते तर राजे झोपलेले मग हसले कोण म्हणून आजूबाजूला नजर टाकली तर एका कोपऱ्यात चित्रगुप्त उभे येऊ का म्हणून विचारात होते, थांबा जरा मीच येते नाही तर आपल्या आवाजाने राजे जागे होतील!” “हं.. बोला काय झाले इतक्या रात्री आलात, रात्रीचे २ वाजलेत तुम्हाला काही झोप वगैरे येते कि नाही?” मी सरळ चित्रगुप्तांना फैलावरच घेतले.

Actully , एका चमत्काराबद्दल विचारायला आलो होतो.” इति चित्रगुप्त

“कसला चमत्कार?” मी जरा वैतागतच विचारले एक तर झोपमोड झाली होती.

“ज्याच्या मुळे ब्रम्हदेवाने मला show cause notice दिली, व स्वतः डोक्याला अमृतांजन चोळत बसले तो राज जैन एकदम दाढी करून वर चकचकीत कोट वगैरे घालून होता अशी बातमी नारदांनी दिली, म्हणून विचारायला आलो!”

मी सरळ कप्पाळावर हात मारून घेतला आणि म्हटलं “काय मूर्खपणा आहे, ह्यासाठी झोप मोडायची काय गरज होती, FB वर मेसेज केला असता तरी मी उत्तर दिले असते!"

“पण ब्रम्हदेवाने मला पर्सनली यायला सांगितले होते म्हणून आलो.” चित्रगुप्तांचे स्पष्टीकरण आले समोरून.

“ब्रम्हदेवाचे नाव काढू नका,” माझ्या तोंडाचा पट्टा चालू झाला. “ब्रम्हदेव I hate him, मला म्हणे तुला आता एक Challenge देतो, आणि मी राज जैन ह्यांच्याबरोबर लग्न करावे अशी परिस्थिती निर्माण केली, यथावकाश आमचे लग्न देखील झाले आणि आज पाठवतायेत तुम्हाला बातमी काढायला! असो पण चित्रगुप्त काका, खर सांगू का? मला Challenge देण्याच्या नावाखाली ब्रम्हदेव आजोबांनी मस्त चल खेळली आणि माझ्यासारखे Torture त्याच्या गळ्यात मारले. पण ठीक आहे; आजोबांना त्यांचा राग काढायचा होता ना! असो, आता कालच्या कार्यक्रमाविषयी, काल जे काही पाहिलेत तो चमत्कार नव्हता, ते सत्य होत, त्याच कारण म्हणजे साध सरळ आहे. कि त्याला तो काय करतो आणि काय करायला हवे याची त्याला जाणीव आहे....”

“.... त्याला आणि जाणीव.... Are you in your sense?” माझे बोलणे अर्धवट तोडत चित्रगुप्त तुच्छतापूर्ण सुरु झाले.
एक मोठा सुस्कारा सोडला आणि म्हणाले आहो काका ऐकून तर घ्या, “तुम्ही सगळ्यांनी त्याला एकाच फुटपट्टीत मोजण्याचा प्रयत्न केलात, आजूबाजूच्या मुलांबरोबर त्याला Compare करत बसलात पण त्यावेळी  तुमच्या हे लक्षात आले नाही कि तो वेगळा आणि extra talented आजूबाजूच्या मुलांपेक्षा.....” ह्यावर काकांनी फक्त मान डोलावली आणि मी पुढे माझे प्रवचन चालू ठेवले .... “काका ह्या अडीच वर्षाच्या काळात मी जे त्याला ओळखला आहे ते तुम्हाला त्याचा भाग्य लिहून पण कळाल नाही कि तो कसा आहे ह्याच वाईट वाटत बघा, कारण माझ्यासारख्या arrogant,  खडूस, Short tempered, मुलगी सांभाळणे मज्जा आहे काय?”

“त्याला शिक्षा व्हावी म्हणून तुझ्याशी लग्न लावून दिले आहे. बाळा!” काका मध्येच बडबडले.

पण त्यांना तिथेच थांबवत मी पुन्हा सुरु झाले, “ ब्रम्हदेवाने काय केले ते महत्वाचे नाही इथे आपण राज बद्दल बोलत आहोत, गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत मी त्याची अनेक रूपे बघितली आहेत, ‘तुला काही लक्षातच राहत नाही, सारखा मोबाईल विसरत असतेस’ असे म्हणत तो टिपिकल नवऱ्यासारखा वागतो, तर “Dont Worry! तू करशील बरोबर प्रास्ताविक!” असे म्हणत माझ्या मित्राची भूमिका हि सहजपणे पडतो, तर कधी माझा प्रियकर म्हणून समोर येतो तर कधी माझ्या वडिलांसारखा पण वागतो, प्रत्येक क्षणाला सोबत असतो, तो अतिशय संवेदनशील, कवी मनाचा आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न केला म्हणून तो तुम्हाला समजला नाही, त्याला मोकळा सोडा, तो अपोआप सगळ समजून घेतो, पण जर त्याला बंधनात, नियमात बांधायला गेलात तर मग तुमची साडेसाती चालू करेल! हेच गमक आहे कालच्या कार्यक्रमात तो इतका चकचकीत आणि अत्माविश्वाने वावरत होता, इथेही त्याने स्वतः पुढे न येता मला पाठवले. मी समोर असले तर Back stage ला राहून सगळ शांतपणे manage करत होता. सो आता ब्रम्हदेव आजोबांना जाऊन सांगा अमृतांजनच्या कंपनीला ऑर्डर देऊन ठेवा, कारण आम्ही दोघ एकमेकांच्या साथीने धुडगूस घालणार आहोत. Get ready!!”

इतक्यात राजेंनी आवाज दिला “काय बडबडते आहेस झोपेत? झोप शांतपणे उगीच कुरकुर करू नकोस, झोपेत कुरकुर करत असते”


“कुरकुर? आणि माझी?” असे बडबडत मी घड्याळाकडे बघितले तर सकाळचे ४ वाजले होते, आयला हे चित्रगुप्त काका झोपेचे २ तास खाऊन गेले.

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐
 ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, June 29, 2014

ज्ञानामृत आणि तेही साडीबद्दल

४ जानेवारी २०१४, सक्काळी सक्काळी नवऱ्याने आवाज दिला "तयार झालिस का? आज आपल्या मनराई आणि वृत्तबद्ध वृत्ती या पुस्तकांचे प्रकाशन आहे! काय करतेस किती वेळ? "

"काय कुरकुर लावली आहे सक्काळी सक्काळी? मी तयार आहे ! तुमचीच अंघोळ होण्याची वाट बघते आहे!" इति आम्ही
"झाली माझी अंघोळ! मला काय तुझ्यासारखा वेळ नाही लागत मेक अप करायला !" असे म्हणत बेडरूममध्ये राजे प्रकट झाले
आणि "आपल्या पुस्तकांचे प्रकाशन आहे आणि तू अशी चुरगळलेली साडी नेसालीस?" हे वाक्य इतक्या जोरात होते कि आमची आईपण काय झाले म्हणून किचनमधून धावत आमच्या बेडरूममध्ये आली.

"अरे ती चुरगळलेली नाहीये, Its crush.... " माझे उत्तर पूर्ण होण्याआधी आशा प्रकारची कोणतीही साडी नसते असे "ज्ञान" पाजळण्यास सुरुवात झाली.

शेवटी कसेबसे समजावून आम्ही सासवडला रवाना झालो. तेव्हा ह्यावेळी Raj Niveditaह्यांच्या साडीवरच्या अगाध "ज्ञानाला" स्मरून ह्यावेळी कोणतीही रिस्क न घेता सरळ सिल्क साडी सिलेक्ट केलेली आहे.!!


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Thursday, June 19, 2014

आठवण


माझ्या आजीने मला (त्यावेळी ती मुंबईला राहत होती आणि आम्ही गावी म्हणजे उरणला) एक ताट दिले होते. आजी इतक्या लांबून माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आली कित्ती आनंद झाला. मी त्याच दिवसापासून त्या ताटात जेवायला सुरवात केली ती लग्न होईपर्यंत कायम! पण जेव्हा माझ्या मैत्रिणीनी विचारलं कि आज्जी काय गिफ्ट घेऊन आली तेव्हा मी ताट दाखवलं तर त्यांची Reaction होती कि, “ताट? तुला आजीने ताट दिले, खेळणी, खाऊ किंवा कपडे अस काही द्यायचं सोडून ताट दिलं?” त्यांची बोलणी ऐकून मी थोडं खट्टू झाली होती

पण माझ्यासाठी आजी गिफ्ट घेऊन आली हीच महत्वाची गोष्ट आहे. आणि तिची आठवण माझ्यासोबत असणं किती मोठी गोष्ट आहे हे मला ती गेल्यानंतर कळाल.

माझ्याकडे मात्र तिने दिलेले स्टील चे ताट आहे.

माझा वाढदिवस २४ मे ला असतो त्यावेळी मला ते ताट गिफ्ट केले, त्यामुळे माझा भाऊ लगेच तिला ताट गिफ्ट केले, मलापण हवे म्हणून भांडू लागला तेव्हा आजी त्याला म्हणाली तुझा वाढदिवस २७ जूनला आहे तेव्हा मी तुला देईन, पण १९ जूनला आजी देवाघरी गेली. आणि त्यानंतर जेव्हा माझ्या भावाचा वाढदिवस आला तेव्हा म्हणाला “आज्जी मला ताट गिफ्ट देणार होती आणि त्या आधीच देवाघरी गेली.”

तिची हि आठवण आता माहेरी आहे पुढल्या वेळी गेली कि माझे ताट आईकडून घेऊन यायला हवे. आजीची शेवटची आठवण आहे माझ्याकडे

19 जून १९९२ ते आज २०१४ आठवण येतेच! Miss u आजी तू लवकर का गेलीस?





~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, June 18, 2014

१४ जून २०००

१४ जून २०००, घड्याळात ४ चे ४:३० झाले. आता माझा रिझल्ट कोण बघणार कारण त्यावेळी इंटरनेट वर निकाल जाहीर होत नव्हते आणि ज्याचा निकाल लागणार त्याला घराचे कधीच शाळेत पाठवत नसत कारण उगीच टेन्शन नको दुसरे कोणीतरी बघून यायचे, पण माझ्यासाठी कोण जाणार? शेवटी मीच तयार झाले. आजोबांना आवाज दिला “मी जाते आहे शाळेत निकाल घेऊन येते.”

“तू जाशील ना? नीट जा काही होऊ दे किती मिळतील तेवढे मिळतील चिंता करू नकोस.” असे म्हणून मला पाठवले.

मी अगदी झाशीच्या राणीच्या थाटात मी कोणाला घाबरत नाही (तस आजही मी कोणाला घाबरत नाही!) अशा अविर्भावात शाळेत दाखल झाले. पण आतून पुरती घाबरलेली होते कारण वर्गातील कोणीच दिसत नव्हते, कोणाचा भाऊ, बहिण, काका ई. लोक आले होते.  मी माझे हॉल तिकीट दाखवून रिझल्ट मागून घेतला. बघितला तर हुश्श! मी पास आले होते ५४% ने! घरी गेले.

आजोबा माझी वाटच बघत बसले होते मला बघताच म्हणाले “आलीस! किती पडले?” ( नशीब मी पास होणार हे गृहीत धरले होते, नाहीतर माझ्या मोठ्या वाहिनिसारख नाही केले, नववीत असताना वाहिनीने प्रश्न केला होता “ताई, तुमचे किती विषय गेले? मी ऑन द स्पॉट आउट! पास कि नापास पण नाही? सरळ किती विषय गेले! त्यापेक्षा हे बरे!) मी उत्तर न देता सरळ निकाल हातात दिला, खूष व्हावे कि न व्हावे हेच कळत नव्हते. “अग तो प्रकाश मामा आला होता, दादा बरे आहेत ऑपरेशन व्यवस्थित झाले आहे म्हणून सांगायला आला होता”
******

१३ जुन २००० नॉर्मल पावसाळ्याची संध्याकाळ आमच्या मातोश्री आम्हाला उद्देशून “निवे बाय उद्या रिझल्ट आहे तुमचा दहावीचा, घाबरू नको काय पडतील ते पडतील मार्क!” (असे म्हणून किमान आम्ही पास होऊ असा विश्वास दाखवला होता!) इतक्यात पिताश्रींची एन्ट्री “आई! एक कप चहा दे जरा काम आहे बाहेर जाऊन येतो” (अजूनही मुलांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून आमचे पिताश्री आम्ही समोर असलो तर स्वतःच्या बायकोला आईच म्हणतात, आणि आमच्या मातोश्री दादा )
मातोश्री “देते चहा मी! पण तुम्ही कुठे? हे बघा आता ७ वाजत आलेत पावसाळ्याचे दिवस आहेत उगीच कुठे जाऊ नका!” सरळ आदेशच दिला.
“अग जरा एक काम आहे ते करून येतो पिरकोनला जाऊन येतो.” (जवळच असलेल्या गावाचे नाव) पिताश्री समजावण्याच्या सुरात
“आत्ता पिरकोनला काय काम आहे? काही जाऊ नका! हा घ्या चहा!” इति मातोश्री
“मी भाऊंकडे जाऊन येतो, मी आत्ता गेलो नाही तर ते सक्काळी सक्काळी घरी येऊन माझे डोके खातील” पुन्हा एकदा पिताश्री
“काय करायचे ते करा! निवे वरच्या खिडक्या बंद केल्यास का? करून येजा पहिले” मातोश्री गरजल्या
मातोश्री आणि पिताश्रींचा सुसंवाद ऐकणारी मी माझे नाव ऐकताच दचकून खिडक्या लावायला पाळले.
नेहमीची सटरफटर कामे करण्यात मी वेळ घालवत होते. 

८ वाजले असतील औषधे घ्यायची असल्याने नेहमी प्रमाणे आजोबांनी आईला आवाज दिला “प्रतिभा जेवायला बसुया का?”
आई “भूक लागली असेल तर बसुया पण अजून दादा नाही आलेत.”
“मला जेवण दे, मला औषधे घ्यायची आहेत! दादा काय त्याची कामे केल्याशिवाय येणार नाही!” इति आजोबा
“ये पोरानो तुम्ही पण जेवून घ्या!” आईने आवाज दिला
“तुम्ही तिघे (मी आजोबा आणि माझा मोठा भाऊ) जेवून घ्या मी दादांसाठी थांबते.” आई
“नेहमी जेवून घेतेस ना मग आज तरी कशाला थांबतेस, जेवून घे.” आजोबा आणि आईचा संवाद चालू झाला
आम्ही दोघे (मी आणि माझा भाऊ) दोघे खाली मान घालून जेवू लागलो.
“नको dady मी थांबते” आई
संवाद संपतच होता इतक्यात आईची चुलत बहिण घरी आली,
“ताई जेवला बसलीस?” मावशी
“नाय ग बोल, काय झाल आज अचानक आलीस” आईने विचारले
“काकीचे कडे गेल्तो तिकडून इकडे आलो” मावशी
“ताई तू टेन्शन नको घेऊन.” मावशी पुन्हा
“मी कशाला टेन्शन घेऊ” आई
“नाय म्हणजे....” मावशी
“काय झाल बोल?” आई
“काकीसचे कडे होतो तेव्हा आपल्या कृष्णाकाकाच्या प्रशांत ने फोन केलता....” मावशीचे वाक्य अर्धवट तोडत आई म्हणाली “बोल मी ऐकते आहे.”
“नाय म्हणजे तू घाबरू नकोस पन भाऊंचा अक्सिडेंट झालाय..” मावशीने एका दमात सांगून टाकले.
“तरी मी सांगत होते जाऊ नका म्हणून पण माझ ऐकत कोण, बर निकेतन पटकन जेवण संपव आपण जाऊन, किती लागलंय काही माहित आहे का तुला?” आईने मावशीला प्रश्न केला
“नाय माहिती” मावशी,

“बर ठीक आहे, घाबरू नको मी बघते  काय करायचे ते!” आमची आई मावशीलाच धीर देत होती.
भाऊ आणि मी पटकन जेवण आटोपले. आई आता मध्ये गेली “ Dady दादांचा अक्सिडेंट झालाय, मी जाऊन येते. तुम्ही नीट काळजी घ्या, काय असेल तर मी नंदाबाय च्या घरी फोन करीन. ” आणि आजोबांशी बोलताना कपाटात होते तेवढे पैसे घेतले. आणि निकेतनला आवाज दिला “बाबू जरा मागच्या गल्लीतील लक्षु मामा ला आलाय का ते बघ आणि त्याला दादांचा अक्सिडेंट झालाय तेव्हा रिक्षा काढायला सांग जा!” आणि मला आवाज दिला “निवे मी जातेय, घरात आजोबा आणि तूच आहेस, त्यांच्याबरोबर भांडू नकोस!”

इतक्यात निकेतन ने आवाज दिला “ताई (तो आईला ताई म्हणतो) चल मामाने रिक्षा काढली आहे. बाजूचा शान्त्या दादा पण बाईक घेऊन निघाला आहे पुढे.”
आई नि भाऊ गेले घरी मी आणि आजोबा, काय झाले असेल ह्या विचाराने झोप येत नव्हती सो आम्ही फक्त वाट बघत होतो कि निरोप येईल किंवा आई दादा येतील शेवटी रात्री ११ वाजता दरवाजा वाजला मी लगबगीने दरवाजा उघडला. तेव्हा आई दिसली पाठोपाठ, बाजूचा शान्त्या दादा, निकेतन, D. K. पाटील, दीपक दादा अशी मंडळी दादांना घेऊन घरात येत होती. जास्त कुठे लागलेले नसले तरी पायाला पट्टी बांधलेली दिसत होती. दादांना खुर्चीवर बसवले व “काही हवे असेल तर आवाज द्या म्हणून” एक एक जण निरोप घेऊन गेला.

आईने परत निकेतनला आवाज दिला “निकेतन वरच्या बेडरूम मधून गादी  खाली आणून टाक.” आणि मग आपला मोर्चा दादांकडे वळवत “तरी मी तुम्हाला सांगितलं होत जाऊ नका म्हणून?” दादा खाली मान घालून सगळे ऐकून घेत होते, “चला थोडे खाऊन घेऊ या तुम्हाला औषधे पण घ्यायची आहेत”
जेवून झाल्यावर आई म्हणाली “आता झोपूया उद्या सकाळी तुमचे ऑपरेशन आहे.” आम्ही झोपणार पण दादा अपघाताची कथा सांगण्यासाठी इंटरेस्टेड होते त्यामुळे दादांनी आईला न जुमानता कथा चालू केली
“मी काम उरकून परत येत होतो, इतक्यात पाऊस चालू झाला आता उघड्यावर थांबण्यापेक्षा हळू हळू गाडी काढून घरी येऊ असा विचार करून मी गाडी हळू हळू गाडी चालवत होतो पण पावसामुळे रस्त्यात असलेला खड्डा दिसला नाही आणि  त्या खड्ड्यात असलेला मोठा दगड हि. त्या दगडाला गाडी धडकून मी सरळ बाजूच्या शेतात उडालो सुदैवाने मागून प्रशांतची (आईचा चुलत भाऊ) गाडी येत होती. त्यांनी कोणाला तरी उडालेला बघितलं म्हणून ते माझ्या जवळ आले, त्यांनीच मला उचललं, माझी गाडी चालू केली, मी त्याला म्हटलं पण अरे मला पाय उचलता येत नाही तूच गाडी चालव, त्याने दादांची गाडी ताब्यात घेतली आणि तो चावू लागला आणि प्रशांत मामाची गाडी त्याच्या सोबत असणाऱ्या माणसाने चालवायला घेतली पुढे स्ट्रीट लाईटच्या उजेडात लक्षात आले कि पायातून रक्त येते आहे, म्हणून मग त्याने मला डॉ. खोपकरांच्याकडे नेले. त्यांनी पण  कंडीशन लक्षात घेता मी प्रथमोपचार करतो तुम्ही यांना पनवेलला न्या मी चिट्ठी देतो दगडाला धडकले असल्याने पोलिस केस पासून सुटका होती. तिथे मग तुम्ही सगळे जण जमला होतात.”
“पुरे झाली कहाणी चला झोपा आता उद्या ऑपरेशन आहे उद्या काय ते कळेल” आईने आवाज दिला.
*******
दुसरे दिवशी आमच्या जेवणाची थोडीफार सोय करून आणि उरलेली सोय मला “जसे जमेल तसे कर” असे सांगून आई आणि निकेतन दादांना घेऊन पनवेलला डॉ. म्हात्रेकडे गेले. घरी मी आणि आजोबा.
मी आपल्या नेहमीच्या कामात म्हणजे टीव्ही बघणे, आजोबांना त्रास देणे वगैरे  तसेच आई नसल्याने जी काही कामे वाट्याला आली होती ती करत होती. याच काळात मी स्वयंपाक करायला शिकले पण जसा जसा वेळ जात होता तसे टेन्शन येत होते घरी फोन नव्हता त्यामुळे काही महत्वाचे असेल तरच कॉल येणार. तिकडे दादांचे ऑपरेशन इकडे रिझल्ट! निकाल ४ वाजता जाहीर होणार होता.
******
मी आजोबाना म्हटले कि  “ठीक आहे मी येते जाऊन मामाकडे.”
मामाच्या घरी गेली तर मामा नुकताच आला होता, मला बघितल्यावर म्हणाला “तुझा रिझल्ट आणायचा असेल ना? थांब १० मिनिटे मी जाऊन येतो”
“मामा नको, मी जाऊन आले, पास झाले मी.” मी म्हटले
“शाबास” मामा म्हणाला “दादांना ७ वाजता सोडणार आहेत. तुला दवाखान्याचा नंबर देऊ का?”
मी म्हटले “दे” त्याच्याकडून नंबर घेऊन त्या म्हात्रे हॉस्पिटलला फोन केला. रिसेप्शन वर निरोप देऊन आईला बोलावून घेतले आणि तिला विचारले कि दादा कसे आहेत, झाले का सगळे व्यवस्थित?” पलीकडून आईने  “हो” सांगितले. आणि मग माझ्या रिझल्टची चौकशी केली मी तिला सांगितले कि   मीच रिझल्ट आणला पास झाली आहे” “अभिनंदन” आई एवढेच म्हणाली आणि डॉक्टर बोलावत आहेत डिस्चार्ज देणार आहेत आता मी जाते.”
फोन ठेऊन मी घरी आले आणि आजोबाना घडलेला वृत्तांत कथन केला.
संध्याकाळी ७ च्या आसपास आई दादांना घेऊन आली. मग पुन्हा एकदा दादांच्या ऑपरेशनची चर्चा झाली कि “त्या वेळी फूटरेस्ट चा रॉड पायाच्या अंगठ्याच्या पुढे सरळ हाडापर्यंत आत घुसला होता किमान २ बोटे एकदम जातील अशी जखम झाली होती एक्सरे रात्रीच काढला होता पण रिपोर्ट सकाळी मिळणार होते नशिबाने हाडाला दुखापत झाली नव्हती. पायाची स्कीन हि फाटली होती. आणि आत थोडी माती गेली होती पूर्ण जखम आतून साफ करण्यासाठी ऑपरेशन करायला घेतले होते. नशिबाने त्यांना डायबेटिज नसल्याने जखम भरण्यास जास्त त्रास होणार नव्हता पण किमान ६ महिने पायाच्या पंजावर वजन टाकता येणार नव्हते. ह्याही पुढे जाऊन कळलेली हकीकत अशी कि त्याच ठिकाणी दादांच्या आधी दोन अपघात झाला होता आणि त्या केसस पण सेम हॉस्पिटलला आल्या होत्या, जिथे आता दादांना नेले होते पण ते दोघेही वाचले नाहीत  ह्या सगळ्या गडबडीत मी पास झाल्याचे पेढे आणायलाच झाले नाही. आज २०१४ चालू आहे पण १०वीचा निकाल जाहीर होणार असले कि हि आठवण हमखास येते.