चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पुस्तक: 
चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद
लेखक: 
मारुती चित्तमपल्ली
प्रकाशक: 
मौज प्रकाशन गृह 

परवाच अमेयदाना काही पुस्तके पाठवली त्यात मारुती चित्तमपल्ली चकवाचांदण हि होते, पुस्तके मिळताच त्यांनी चकवाचांदण बरेच दिवस शोधात होतो आता मिळाले अशा आशयाची पोस्ट फेसबुक वर टाकली त्यावेळी सर्वांचे लाडके मामाश्री व अमेयदा यांच्याशी झालेल्या बोलण्यामुळे वाटून गेले कि आपण चकवाचांदण वर लिहावे खरे तर मी खूप आधी हे पुस्तक वाचले होते, त्यावर लिहूनही ठेवले होते पण ते प्रकाशित केले नव्हते J आज अमेयदामुळे ती जुनी वही काढून लिहिते आहे......

पुस्तक वाचन म्हणजे एक व्यसनच असत. त्याच व्यसनामुळे आजपर्यंत बरीच पुस्तके वाचनात आली, त्यातली काही मनाला भावली, काहींनी तर मनात घरच करून ठेवले, अशाच काही पुस्तकांपैकी एक पुस्तक म्हणजे “चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद”. हे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा वाटले होते कि त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे वन्यजीवनावर आधारित असेल पण वाचताना हळू हळू लक्षात येऊ लागले कि  हे पुस्तक म्हणजे चितमपल्ली याचं आत्मकथन आहे.


ह्या पुस्तकात पहिल्या १२३ पानापर्यंत त्यांच्या घराची माहिती त्यांनी दिली आहे. सोलापूर आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सरधोपट वाटा न चोखाळता सरळ कोइम्बतुर येथील  State Forest Service College ला अ‍ॅडमिशन घेतले व वनाधिकारी झाले.

 

वनाधिकारी असलेले मारुती चित्तमपल्ली हे एक उत्तम लेखक हि आहेत. भारतीय वन आणि वन्य जीवनामध्ये जेवढी विविधता आढळून येते तशी जगाच्या पाठीवर अन्य कुठेही आढळून येत नाही, हे आपल्या लेखनाने त्याने दाखवून दिलेले आहे. ह्या जंगलांच्या वाटेवरच त्यांचे अनुभव विश्व आधारलेले आहे. ते नांदेड येते वन अधिकारी असताना, त्यांना कळले कि काही पक्ष्यांची महिती हि संस्कॄत मधे उपलब्ध असल्याने त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी ते वयाच्या ३५ व्या वर्षी शिकवणीला जात होते.


असे हे मारुती चित्तमपल्ली  वनाधिकारी असताना त्यांना भारताला विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली तमिळ नाडू ,कोडाई,कर्नाटक,बँगलोर, महाराष्ट्रातील महाबळेश्वर वडगाव, नांदेड, इसालापूर, बोटा, राजूर, पनवेल, पुणे, कर्नाळा, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी त्यांनी काम केल...प्रत्येक ठिकाणी आदिवासी त्यांच्या भाषा राहणीमान, खान पिन, याविषयी नोंदी केल्या. काही ठिकाणी खूप त्रास झाला कारण आदिवासींची भाषाच समाजत नव्हती...आदिवासी फोरेस्ट officers ना खूप घाबरतात हे नव्यानेच कळल...एरवी जंगलात राहणारी हि जात वनाधिका‌‌‍र्‍यांना का घाबरते याच कारणही दिल आहे..शिकारीवर घातलेले निर्बंध,वनातला प्रदेश शेतीखाली आणू नये याचे निर्बंध यामुळे ते गरीब लोक घाबरतात... त्यांच्या राहाणिमानाच अतिशय सुंदर वर्णन या पुस्तकात केल आहे. 


चित्रकार आलमेलकर, पु.ल.देशपांडे, बाबा आमटे, साधना ताई, व्यंकटेश माडगुळकर, गो.नि.दांडेकर, जि.ए.कुलकर्णी, सलिम अलि यांच्यासोबत घालवलेल्या मह्त्वपूर्ण क्षणांच वर्णनही दिल आहे.

 

हे पुस्तक हातात घेतल्यावर पुस्तकाची खटकणारी गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल घुबडाच चित्र पाहिलं कि पहिला प्रश्न आपल्या मनात येतो तो म्हणजे चकवाचांदण इतका सुंदर काव्यमय नाव आणि चित्र घुबडाच ? पण लेखकाने या प्रश्नाला खरच खूप छान उत्तर दिलय. रानावनात राहणारे पारधी, आदिवासी घुबडाला 'चकवाचांदणं ' म्हणतात. ज्या घुबडाला आपण अशुभ मानतो त्याच नाव इतका काव्यमय असू शकत? म्हणून लेखकाने ह्या गोष्टीचा अर्थ पारध्यांना विचारला असता, तेव्हा पारध्यांनी सांगितले कि  हा अभद्र पक्षी सांजेच्या वेळी ओरडून त्यांची दिशाभूल करतो व त्यांना चकवा लागतो. अशावेळी हे पारधी-आदिवासी  जंगलात जिथे असतील तिथेच  बसून राहतात. पण अभाळात शुक्राची चांदणी दिसू लागताच हा चकवा निघून जातो आणि त्यांना त्यांची वाट सापडते, म्हणून घुबडाला ते 'चकवा चांदण' अस म्हणतात.

 

चित्तमपल्ली यांना हे नाव फार भावले व ते त्यांच्या जीवनप्रवासाप्रमाणे होते. त्यामुळे ज्यांनी रानातला संधिप्रकाश व घुबडाचे ओरडणे ऐकले त्यांना या नावाची प्रचीती नक्की येईल. पुन्हा पुन्हा वाचावे असे हे पुस्तक आहे.  पुस्तकाची किमत थोडी जास्त वाटू शकते पण पुस्तक वाचल्यावर आपल्या विचारातील (किमतीचा) ठीतेपणा जाणवतो.सर्वच वयातील वाचकांनी वाचावे असे आणि आपल्या संग्रहात असावे असे हे पुस्तक तुम्हालाही नक्कीच आवडेल अशी अशा करते...


~●๋•Nivedita Patil - Jain ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!