पुस्तक: चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद लेखक: मारुती चित्तमपल्ली प्रकाशक: मौज प्रकाशन गृह परवाच अमेयदाना काही पुस्तके पाठवली त्यात मारुती चित्तमपल्ली चकवाचांदण हि होते, पुस्तके मिळताच त्यांनी चकवाचांदण बरेच दिवस शोधात होतो आता मिळाले अशा आशयाची पोस्ट फेसबुक वर टाकली त्यावेळी सर्वांचे लाडके मामाश्री व अमेयदा यांच्याशी झालेल्या बोलण्यामुळे वाटून गेले कि आपण चकवाचांदण वर लिहावे खरे तर मी खूप आधी हे पुस्तक वाचले होते, त्यावर लिहूनही ठेवले होते पण ते प्रकाशित केले नव्हते J आज अमेयदामुळे ती जुनी वही काढून लिहिते आहे...... पुस्तक वाचन म्हणजे एक व्यसनच असत. त्याच व्यसनामुळे आजपर्यंत बरीच पुस्तके वाचनात आली, त्यातली काही मनाला भावली, काहींनी तर मनात घरच करून ठेवले, अशाच काही पुस्तकांपैकी एक पुस्तक म्हणजे “चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद”. हे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा वाटले होते कि त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे वन्यजीवनावर आधारित असेल पण वाचताना हळू हळू लक्षात येऊ लागले कि हे पुस्तक म्हणजे चितमपल्ली याचं आत्मकथन आहे. ह्या पुस्तकात पहिल्या १२३ पानापर्
माझ्या भाषणाची original script जशी च्या तशी देत आहे . आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपिठा समोरील आदरणीय ज्ञाते श्रोते आणि वक्ते मी आपण समोर विषय मांडत आहे पर्यावरण संवर्धन. द्रोणागिरी स्पोर्ट्स ची स्पर्धा जाहीर झाली. त्यात दिलेली तीनही विषय वाचल्यावर मला प्रश्न पडला कि मी कोणत्या विषयावर बोलू. मलाच कळत नव्हते विषय काही निश्चित होईना आणि अचानक मी दूरदर्शन वर लागलेला हुप्पा हुया हा चित्रपट पहिला त्यामधला धरणी माय हा एक पात्री संवाद ऐकला आणि वाटलं पर्यावरण संवर्धन ह्याच विषयावर आपण बोलायचं विषयाला सुरवात करण्यापूर्वी धरणी माय चा एक पात्री संवाद म्हणावसं वाटतोय करणं त्याशिवाय हे भाषण पूर्णच होऊ शकत नाही "अरे धरणी मातेचं रडणं आणि दुखणं समजून घे मेरे भाय निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय? दिसलं ती जमीन कसून घेतो, रस समदा शोषून घेतो माय मारू दे, फायद्याची इकडे साम्द्यानच झाली घाय निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय? कारखान्याच्या चिमणीतून धूर भसाभसा वरती समद पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा वर्षातले १२ महिने कडक उन्हात जय निसतच म्हणतो धरणी माय पण तिच
‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात कलेची जाण असणा-या मातीमध्ये बालगंधर्व नावाचे रोपटे तरारले आणि नंतरची ५०-६० वर्षे हा गायनाचा, अभिनयाचा कल्पवृक्ष सतत बहरत राहिला. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण बालगंधर्व या नावाची जादू काही ओसरली नाही. संगीत नाटकाचा सुनहरा जमाना संपला तरीही महाराष्ट्राने बालगंधर्वांना दूर लोटले नाही. पल्लेदार नाट्यगीते गाणारा हा आवाज पुढे भक्तिगीते आणि अभंग गाऊ लागला. वृद्धत्व आले, अपंगत्व आले तरीही महाराष्ट्र्राचे या व्यक्तिमत्त्वावरचे प्रेम काही कमी झाले नाही. बालगंधर्वांनीहि महाराष्ट्राला भरभरून दिले. लोकमान्य टिळकांचा तो सुवर्णकाळ होता. त्यांनीच नारायण राजहंस या सुरिल्या गळ्याच्या मुलाला ‘बालगंधर्व’ ही उपाधी दिली. लोकमान्य टिळक यांनी गायकवाड वाड्यातील गणेशोत्सवामध्ये छोट्या नारायण राजहंसाचे गाणे ऐकले. खरे तर हे गायन चालू असताना लोकमान्य ‘केसरी’ च्या अग्रलेखाचे लेखन करीत होते. पण नारायणाच्या आवाजाची, आलापाची जादू अशी
thik ahe starting la adakali hotis nantar thik ahe.
ReplyDeleteChangale keles g bhashan...
ReplyDelete