गोविंदा

आज घराची फार आठवण झाली, घराशेजारी गणपतीचे मंदिर आहे माझ्या बेडरूम ची खिडकी उघडली कि देवळाचा कळस दिसायचा.  गणेश जन्मापासून ते एकादशी पर्यंत सगळे उत्सव साजरे होतात, जन्माष्टमी म्हटली कि रात्री १० नंतर देवळात कीर्तनाला सुरुवात व्हायची ( जन्म रात्री १२चा असल्याने सगळे आवरून कीर्तनाला सुरुवात करायचे)

नेहमीची श्रीकृष्ण जन्मकथा अगदी रंगवून सांगितली जायची दरवर्षी नवीन कीर्तनकार असायचे प्रत्येकाची सादरीकरणाची पद्धत वेगळी असायची, रात्री कीर्तन म्हटल्यावर वैताग यायचा कारण हे १ वाजेपर्यंत कीर्तन करणार मग झोपेचे खोबरे दुसर्या दिवशी श्रीकृष्णाची पालखी आणि संध्याकाळी band च्या गजरात दही हंडी फोडली जायची.

त्यावेळी त्या कीर्तनाचा त्रास व्हायचा, काय हे रात्री कीर्तन करत बसतात शांतपणे साजरा नाही का करू शकत ;पण आज हे जाणवते आहे कि देवळातले कीर्तन किती शांत आणि संस्कार घडवणारे होते,  कीर्तनातून सांगितली जाणारी श्रीकृष्ण जन्मकथा प्रत्येकवेळी काहीतरी नवीन विचार शिकवणारी होती. आणि आज शिकणे सोडून द्या; ह्या दणदणाटा पुढे साधा विचार हि करता येत नाही, कसलीतरी फालतू गाणी आणि गोंगाट हेच स्वरूप झाले आहे... त्यापेक्षा आमचा गाव बरा होता  


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!