सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ 8

मागील भाग
२०१० जुलै मध्ये " सन १८५७ च्या वीर महिला" हि मालिका लिहायला सुरुवात केली आजही ती अपूर्ण आहे. आज त्यात एका नावाची भर पडली आहे ते नाव म्हणजे "राणी द्रोपदी बाई"!! राणी द्रौपदी म्हटले कि आपल्याला महाभारत आठवते पण हा लेख वाचाल्यावर तुम्हा महाभारता बरोबर १८५७ चे स्वातंत्र्यसमर हि आठवेल. २२ मे १८५७ ते ३० ऑक्टोबर १८५७ ह्या ५ ते ६ महिन्याच्या काळात ह्या राणीने ब्रिटिशानां घाम फोडला होता!!!
धारच पुर्वैतिहास

धार हे १८५७ च्या युद्धातले एक महत्वपूर्ण ठाणे होतं. २२ जुलै १७३२ रोजी थोरल्या बाजीराव पेशव्याने आनंदराव पवाराला धार आणि आसपासच्या परगण्यांचा हक्क दिला. त्यातून संस्थानाचा उगम झाला. मराठ्यात महत्वाच्या ठरलेल्या शिंदे- होळकर- पवार ह्या त्रयी पैकी हे पवारांच घराणे.

स. १८१७ त इंग्रज जेव्हां पेंढाऱ्याच्या उच्छेदाकरितां माळव्यांत शिरले तेव्हां पवारांच्या ताब्यांत केवळ धार शहरच होतें पुढें इंग्रजांचा व धारकर यांचा तह होऊन इंग्रजांनीं राज्याचें रक्षण करण्याचें काम पत्करून ३५ हजार वसुलाचा मुलुखहि मिळवून दिला. त्यानंतर १८१९ मध्ये भिल्ल पलटणी ठेवायची इच्छा इंग्रजांची नसली तरी धार हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आजूबाजूचा परिसर सहज हाताखाली येईल म्हणून ह्या पलटणीला मान्यता दिली व माळवा भिल्ल पलटणी साठी संस्थानाने सालिना सु. ६००० रु. द्यावे असे ठरले. काळ पुढे सरकत गेला परंतु पवारांची सत्ता कायम धार नगरीवर राहिली.

१८२२ च्या सुमारास राजे यशवंतराव(II) पवार यांचा जन्म झाला व ते धार नगरीचे ८ वे राजे म्हणून १८३३ साली गादीवर आले. त्यांचा विवाह द्रौपदी बाईसाहेबांसोबत झाला.

१८५७ ची पार्श्वभूमी

राजा यशवंतराव(II) पवार आजारी पडले. आपल्याला वारस नसल्याने हि गादी इंग्रजांच्या हाती जाईल कि काय ह्याची भीती त्यांना लागून राहिली होती. म्हणून त्यांनी आपल्या नात्यातल्या एका मुलाला २० मे १८५७ रोजी दत्तक घेतले होते. त्यांचे नाव आनंदराव(III) पवार त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे २२ मे १८५७ राजा यशवंतराव(II) पवार यांचा मृत्यू झाला. ह्या वेळी इंग्रजांनी इतर संस्थानाप्रमाणे न वागता आनंदराव(III) पवार यांच्या दत्तक विधानाला मंजुरी दिली व त्यांचा राज्याभिषेक करून, आनंदराव(III) अल्पवयीन असल्याने कारभाराची सूत्रे महाराणी दौपदी बाईसाहेबांनी आपल्या हातात दिली.

संग्रामात उडी

आपण दत्तक विधानास मान्यता दिली असता राणी आपल्या विरोधात जाणार नाही असा कयास होता. परंतु राणीने ब्रिटीशांची चाल ओळखून त्याच्याबरोबर मैत्री करण्याएवजी क्रांतीकारकांशी सख्य केले. ह्याच वेळी ग्वाल्हेर हे शिंद्याचे संस्थान होते व ते झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब ह्याना मदत करेल तेव्हा त्या भागात ब्रिटिशांनी तेथील पहारा मजबूत केला. व राणी लक्ष्मीबाई व नानासाहेब ह्याना तेथून काढता पाय घ्यावा लागला होता अशा वेळी त्यांना आश्रय मिळाला तो धार च्या किल्ल्यात त्याच बरोबर गुलखान, बादशाह खान, सआदत खान हे क्रांतिकारी हि धार च्या किल्ल्यात आश्रयाला होते. आपल्यातल्याच फितुरीमुळे राणीचे हे वागणे ब्रिटीशांना कळाले. Caption Hutchinson ला हि बातमी कळाली व त्याने कर्नल ड़्यूरेन्ड़ ला ह्या बातमीचा रिपोर्ट केला.

कर्नल ड़्यूरेन्ड़ ला आधीच हे दत्तक विधान नामंजूर होते. त्याला हे संस्थान खालसा करावयाचे होते पण लॉर्ड डलहौसी मुळे काही करता आले नव्हते. त्यामुळे त्याने हि बातमी हाती लागताच त्याने जुलै १८५७ मधेय धार नगरीवर हल्ला केला. राणीने आपल्या भिल्ल पलटणीच्या मदतीने त्यांना थोपवून धरले.

संग्राम आणि शेवट

राणीने आधी सर्व क्रांतीकारकांची व्यवस्था लावली त्यांना किल्ल्याच्या आत असलेल्या गुप्त मार्गाने बाहेर काढले. व स्वत: इंग्रजांशी टक्कर देत बसली. परंतु सैनिक कमी त्यात माजलेली फितुरी. ह्यामुळे राणीची पीछेहाट होऊ लागली.

ब्रिटीशांनी धार किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर ताब्यात घेतला होता. ऑक्टोबर १८५७ च्या सुरुवातीस दीवाण रामचंद्र बापूनां बंदी बनवले. त्यांना वाटले होते बापुंकडून काही माहिती मिळेल. परंतु बापू फुटले नाहीत ब्रिटीशांनी त्यांचे हाल – हाल करून मारले. १५ ऑक्टोबर १८५७ रोजी किल्ल्याला वेढा पडला. राणी व तिच्या सहकार्यांनी अफाट चिकाटी दाखवली किल्ल्याचा आजूबाजूचा प्रदेश ब्रिटीशांच्या ताब्यात गेल्यामुळे किल्ल्याला बाहेरून मिळणारी रसद बंद झाली, त्यातच रामचंद्र बापू यांचे पकडले जाणे, किल्ल्यात असलेल्या रसदेपैकी अर्धी रसद क्रांतीकारकांना पुढच्या प्रवासाला उपयोगी पडेल म्हणून सोबत दिलेली, अशाही स्थितीत राणीने आपल्या २००० च्या भिल्ल पलटणी सोबत किल्ला झुंजत ठेवला होता. १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर घमासान युद्ध झाले.

ब्रिटीशांच्या तोफांमुळे किल्ल्याच्या भिंतीना खिंडारे पडू लागली. त्यामुळे राणीने एका रात्रीत किल्ला सोडण्याच्या निर्णय घेतला. किल्ल्याला असलेल्या गुप्तद्वारातून ती आपल्या सैन्यासह बाहेर पडली. तिने बाजूच्या जंगलांचा आधार घ्यायचे ठरवले. ३१ ऑक्टोबर १८५७ ला ब्रिटीश सैन्य किल्ल्यात घुसले तेव्हा त्यांना राणी हाती लागली नाही.

त्यानंतर राणीची शोध मोहीम हाती घेण्यात आली. पाठीवर ब्रिटीश सैन्य खेळवत राणी जंगलातून जात होती जोडीला १३ वर्षाचे आनंदराव(III) पवार होते. आनंदरावांची व्यवस्था ग्वाल्हेर येथे केली व राणी पुन्हा एकदा ब्रिटीशांना टक्कर द्यायला मोकळी झाली. राणी स्वत: बेघर होऊनही जमेल तशी मदत क्रांतिकारकांना करत होती. शेवटी ती एकटी असताना आपण ब्रिटीशांच्या हातात सापडू नये म्हणून तिने स्वत:च तलवारीने आपले आयुष्य संपवले. तिच्याच भिल्ल पलटणीने तिचे अंतिम संस्कार केले.

नवा डाव

1860 साली पुन्हा एकदा आनंदराव(III) पवार यांचा राज्याभिषेक झाला व ते अल्पवयीन असल्याने त्यांच्या वतीने ब्रिटीश कौन्सिल राज्यकारभार बघत होती. आणि ते कुणी क्रांतिकारी असेल तर त्याला मदत करीत असत तेही ब्रिटीशांच्या नकळत.

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

  1. ब्रिटीशांच्या हातात सापडू नये म्हणून तिने स्वत:च तलवारीने आपले आयुष्य संपवले.
    Brave !!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!