मोरपीस

                 नातं म्हणजे मनाच्या पुस्तकात जपलेलं मोरपीसच असतं ना! आपलं मन किती हळवं असत?? काही वेळा आपलंच मन आपलं राहत नाही आणि त्याची समजूत घालणे फार कठीण होऊन बसता.... तेव्हा त्याला समजून घेणाऱ्या.. त्याचा आधार बनणाऱ्या..त्याला प्रेरणा आणि बळ देणाऱ्या विश्वात ते रमत तिथे असतं एक नातं... भावनिक बंधांची गुंफण असणारं.. आपल्या भावनांना जपणारं.. मायेची उब देणार, जाणीवांना समजून आधार देणार अशा नात्याची जवळीक फार थोड्या लोकांना लाभते. मनातल्या भावना अन् नात्याचे नवीन अंकुर त्यांचा गुंता कसाही असला तरी हवाहवासा वाटतोच ना!! एका मित्राने चॅट स्टेटस लावून ठेवलं होतं “एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली – जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे.” किती खर आहे हे वाक्य!!

              कारण कधी कधी एखादी व्यक्ती खूप जवळची, आपलीच वाटू लागते. तिचे विचार म्हणजे आपल्याच हृदयातील भावनांचे प्रतिबिंब वाटू लागते. ती व्यक्ती म्हणजे सर्वस्व. अशा वेळी तिथे जन्म घेतं ते एक नाजूक नातं. या नात्याला रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त महत्व असतं. प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण हाच अनुभव आणि त्यातील Passion आयुष्यभर टिकवणे फार कठीण असत. परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. एकमेकांना गृहीत धरण्याची सवय लागते, काय एव्हढ बोलायचं ? काम पण आहेतच कि! कळत कसं नाही आपण कामात आहोत हे तो / ती समजून का घेऊ शकत नाही. आपणच सवय लावलेली असते कामातून वेळ काढून बोलायची आणि तीच काही काळाने तापदायक वाटू लागते.

             अश्या भावनेच्या भरात कोवळ्या विचारांचे अंकुर घेऊन जन्मणार नातं कधी कधी खुपच हळवं असतं नात्यात येणाऱ्या कठीण प्रसंगात हे नातं कोमजून जात. संयमी, सहनशील माणसेच अशी नाती टिकवू शकतात. कारण गरज असते ती आपल्या माणसाला त्याची space देण्याची. अशा वेळी आपल्या मनातल्या भावना योग्य मार्गानं व्यक्त करता येणं ही एक कलाच आहे. ती आपल्यापाशी असली, की आपण आपली बाजू योग्य शब्दांत चांगल्या प्रकारे मांडू शकतो, अगदी वाईटपणा न येता. त्यासाठी जुन्या आठवणी, सोबत घालवलेले क्षण यांची संयमीपणाने आठवण करून देणे, कामाच्या व्यस्ततेमधून ५ मिनिटे का होईना पण आपल्या माणसासाठी वेळ काढलेला वेळ हेच नात्याला पुनर्जीवन देऊ शकतात.

           नात्यात कृत्रिमता वं जाणिवांचा अभाव असेल तर ते नातं कधी नातं नसताच.... अशी नाती फुलण्याआधीच गळून पडतात. तो फक्त बेगडी संबध असतो. अशी नाती वेळ निभावून नेण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी बनवलेली शिडी असते. काम झाल्यावर अडगळीत टाकण्यासाठी! अशी क्षणभराची नाती भौतिक सुखाशिवाय काही देऊ शकत नाही. हे झालं जोडीदाराबद्दल पण सगळ्याच नात्यांना हे लागू होतं.

                 तसंही नातं कोणता का असेना, त्यात मायेचा ओलावा सुख दु:खात समजून घेण्याची, आधार देण्याची, समर्पण व त्यागाची भावना असायला हवी. अशी नाती आज दुर्मिळच! निसर्गदत्त नाती सुद्धा किती दुरावलेली, विस्कटलेली आहेत. आई-वडील, भाऊ-बहिण तसेच इतर कौटुंबिक आपण जपले पाहिजे. दुरावा असेल तर त्याचे कारण आपण शोधायला पाहिजे. ह्या साठी आपल्या मनातील विचारांचा परीघ ओलांडायला हवा. आयुष्य म्हणजे नात्यांच्या धाग्यात गुंफलेला एक सुंदर बंध आहे. ह्या बंधाचा एक जरी धागा विस्कटला तरी संपूर्ण आयुष्य विस्कळीत होतं. तो धागा व्यवस्थित पणे गुंफून आयुष्य पूर्वपदावर आणणे म्हणजे खूप संयामचे काम असते.

             अन् काही नाती अशीही असतात कि ज्यांना आपण कोणत्याच चौकटीत बांधू शकत नाही किंवा शब्दात मांडू शकत नाही. अशी नाती म्हणजे स्वर्गसुखाची जिवंत अनुभूती असते. अशा या मनापासून जपलेल्या नात्यात कितीही संकटे येऊ देत, रुसवे-फुगवे असू देत पण तरी अशा नात्याशिवाय जगणं कठीण असतं. अशी नाती रक्तापेक्षा भावनीक पातळीवर जास्त गुंफलेली असतात. त्यांना वयाचे, जाती-धर्माचे आणि कुठल्याच परिस्थितीचे बंधन नसते. असं नातं ज्यांना लाभत ते भाग्यवान असतात. अशा नात्याची जपणूक करण हेच महत्वाच असतं.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

  1. हळूवार फिरणारं मोरपीस आवडलं!

    ReplyDelete
  2. surekh lihile ahe aapan
    jagnyala arth yenasathi morepiecesarkhi nathi japayachi astat .
    nathe aaiche , nathe maitrinche , nathe priyache, nathe vishwashche.

    .in short thoughful article for bulding and keeping nice fabric of retaltiobship in life

    ReplyDelete
  3. kharach khup sundar lihilay tumhi...

    shevati naate kontehi aso....fakt te japata aale pahije.....nakalat te fulat astech pan te komeju naye yachihi kalji ghyalach havi na......
    aani tya naatyachi halu-halu etki savay hote ki te aaplya aayushyachaa yek avibhajya bhaag hote.....tya natyashivay jagane katin aahe....he nakalat janau lagte....!
    bhavana japayla shikale, ki naat ajun ghatt hote....!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!