What an idea sirji!!!
ऐन गणपतीत आजारी पडल्याने गौरी साठी माहेरी येणे झालेच नव्हते. तेव्हा म्हटले आता बरे वाटत आहे माहेरी जाऊन यावे. यावेळी मुहूर्त निघाला तो संकष्टीचा, भाद्रपदातली संकष्टी म्हणजे साखर संकष्टी आमच्याकडे हिला साखर चौथ असे हि म्हणतात. ह्या साखर चौथीला हि आमच्या भागात गणपती बसतात. मामाकडे गणपती बसत असल्याने माझ्या माहेरी येण्याच्या मुहूर्ताचा फायदा झाला, श्रींचे दर्शन हि झाले आहे सगळ्यांची भेटही झाली. साहजिकच आहे भेट झाली म्हणजे गप्पा होणार आठवणी उजळल्या जाणार अशीच एक गावातील मामांची आठवण निघाली आणि आम्ही खरच म्हणावे लागले What an idea sirji!!! गणपती घरी येणार म्हटले कि सजावट आलीच सजावट म्हणजे मखर बनवण्यासाठी थर्माकोलचा प्रामुख्याने वापर आणि गणेश या मखरात विराजमान झाले कि अखंड जळणाऱ्या समया आणि अगरबत्ती. पूर्वी लहान अगरबत्ती यायची त्यामुळे कोणाला न कोणाला सतत तेथे राहावे लागायाचे मग कुणीतरी अक्कल वापरून मोठ्या अगरबत्त्या मार्केट मध्ये आणल्या त्यावेळी त्या खूप महाग असल्याने रात्रीच लावल्या जायच्या आपण झोपल्यावर देखील अगरबत्ती चालू राहावी हा उद्देश. पण अशा अगरबत्त्या म्हणजे थर्माकोलच्या