What an idea sirji!!!

ऐन गणपतीत आजारी पडल्याने गौरी साठी माहेरी येणे झालेच नव्हते. तेव्हा म्हटले आता बरे वाटत आहे माहेरी जाऊन यावे. यावेळी मुहूर्त निघाला तो संकष्टीचा, भाद्रपदातली संकष्टी म्हणजे साखर संकष्टी आमच्याकडे हिला साखर चौथ असे हि म्हणतात. ह्या साखर चौथीला हि आमच्या भागात गणपती बसतात. मामाकडे गणपती  बसत असल्याने माझ्या माहेरी येण्याच्या मुहूर्ताचा फायदा झाला, श्रींचे दर्शन हि झाले आहे सगळ्यांची भेटही झाली. साहजिकच आहे भेट झाली म्हणजे गप्पा होणार आठवणी उजळल्या जाणार अशीच एक गावातील मामांची आठवण निघाली आणि आम्ही खरच म्हणावे लागले What an idea sirji!!!

गणपती घरी येणार म्हटले कि सजावट आलीच सजावट म्हणजे मखर बनवण्यासाठी थर्माकोलचा प्रामुख्याने वापर आणि गणेश या मखरात विराजमान झाले कि अखंड जळणाऱ्या समया आणि अगरबत्ती.
पूर्वी लहान अगरबत्ती यायची त्यामुळे कोणाला न कोणाला सतत तेथे राहावे लागायाचे मग कुणीतरी अक्कल वापरून मोठ्या अगरबत्त्या मार्केट मध्ये आणल्या त्यावेळी त्या खूप महाग असल्याने रात्रीच लावल्या जायच्या आपण झोपल्यावर देखील अगरबत्ती चालू राहावी हा उद्देश.

पण अशा अगरबत्त्या म्हणजे थर्माकोलच्या मखराला धोका कारण कुठे जरा अगरबत्ती हलली तर ती सरळ मखराला टेकणार आणि मग ...........

घरी गणपती असताना एका रात्री साधारण ९ किंवा १० च्या सुमारास माझ्या वडिलांच्या नात्यातील मामा (आम्ही यांना मामाच म्हणत असू) घरी गणपती दर्शनाला आले. त्यावेळी मी हि मोठी अगरबत्ती लावण्याच्या प्रयत्नात होते.
“बाय नीट लाव अगरबत्ती, नाय तर टेकवशील मखराला”  इति मामा आजोबा
“नाही आजोबा नीट लावते मी, भाऊ प्रसाद दे रे आजोबाना” असे म्हणून मी विषय संपवला
“अरे मामा ये, इतक्या रात्री आलास?” वडिलांनी स्वागत केले.
“अरे वेळच भेटत नाही, कामावरून आलो आज ठरवलंच उशीर झाला तरी चालेल आपले ४-५ घर आहेत तिथे दर्शन करायला गेलेच पाहिजे म्हणून निघालो.” हुश्य हुश्य करत आपली कथा ऐकवली. आम्ही मध्येच “प्रदीप, तू एवढ्या मोठ्या अगरबत्त्या कुठून आणल्यास? मखराला चिकटली म्हणजे?” म्हणून चौकशी केली.
“रात्रभर अगरबत्ती जळावी म्हणून आणल्या आहेत, आपल्या उरणला तो गणपती चौकात नाही का अगरबत्तीवाला बसतो त्याच्याकडून.” वडिलांनी माहिती पुरवली.
त्यावर लगेच मामा चालू झाले “ आमचा दिनेश पण म्हणत होता कि आणूया मोठ्या अगरबत्त्या पण मी नको बोललो आणि त्याऐवजी त्याला “कासवछाप” (पूर्वी मच्छर अगरबत्तीला याच नावाने ओळखायचे आता गुड नाईट नावाने ओळखतात) आणायला सांगितली.”
त्यावर दादांनी (माझे वडील) म्हटले “हो, ह्या पावसाच्या जमा होणाऱ्या पाण्यामुळे मच्छर वाढलेत...” त्यांचे वाक्य अर्धवट तोडत मामा म्हणाले “ म्हणूनच सांगितली, ती कशी गोल आणि चापटी येते, सोबत तिचा stand पण येतो त्यामुळे मखराला धोका नाही, ती लावली आपल्याला मच्छर पण लागत नाही आणि हि केळी वगैरे फळे ठेवलेली असतात त्यामुळे येणारी चिलटे पण पळता, म्हणून मी रात्री देवापुढे सरळ ‘कासवछाप मच्छर अगरबत्ती’ लावतो!”

ह्यावर दादा “मच्छर अगरबत्ती?” आणि पुढे आम्ही सगळेच खो-खो हसू लागलो.
त्यावर मामांचा युक्तिवाद असा कि “देवाने कुठे सांगितले आहे मला सुवासिकच अगरबत्ती हवी आहे?”

हे हि बरोबरच आहे म्हणा.  “What an Idea Sirji!!”


आज ते मामा आजोबा नाहीत पण त्यांची हि Idea आम्ही कित्येक पिढ्यांना देऊ शकू.....

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐
 ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!