Posts

Showing posts from 2012

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ७

मागील भाग   सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ७ १८५७ चा स्वातंत्र्यसंग्रामाला प्रकाशित करणारी आणखी एक ज्योत म्हणजे तुलासीपूरची राणी ईश्वरी कुमारी देवी. तुलसीपूरहे अवध या प्रांताच्या शेजारी व नेपाळ च्या सीमेवरील एक राज्य होते. आज तुलसीपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील एक तालुका असून या तुलसीपूर तालुक्याची उत्तर सीमा नेपाळ शासित प्रदेश आहे व दक्षिण बाजू भारत शासित प्रदेश आहे. नेपाळ शासना अंतर्गत येणार्या या प्रदेशाला “तुलासीपूर/ डांग” म्हणून ओळखले जाते व भारत शासित प्रदेशाला “तुलसीपूर परगणा” म्हणून ओळखले जाते. १८५७ च्या काळात हे हिंदुस्थानात समाविष्ठ होते राणी ईश्वरी कुमारी देवी यांचा पूर्ववृत्तांत तुलसीपूरराज्याचा ४४ वा राजा दृग नारायण सिंह ह्याना ही इतर राजांप्रमाणे ब्रिटिशांच्या कडून खलिता गेला की त्यांच्या राज्यात सामील व्हा. त्यावेळी राजा दृग नारायण सिंग यांनी विरोध दर्शविला. इस्ट इंडिया कंपनीचे मांडलिकत्व स्वीकारायला दिलेला नकार व वेळोवेळी क्रांतीकार्याना केलीली मदत याच्या विरोधात ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर कारवाही करून त्यांना व त्यांचे वड

अमू...........

Image
चित्रपटाचे नाव : अमू वर्ष : 7 January 2005 संगीतकार : नंदलाल नायक  दिग्दर्शक: शोनाली बोस कथाकार / लेखक: शोनाली बोस कलाकार: कोंकणा सेनशर्मा, वृंदा करट , अंकुर खन्ना   रक्षाबंधनाच्या वेळी घरी असताना डिश टीव्ही बंद असल्याने असल्याने सीडीज किंवा डीव्हीडीज लावून चित्रपट पाहणे हा उद्योग चालू असे. अशातच अमू हा चित्रपट पाहिला आणि सुन्न झाले. अवघ्या १ तास ४२ मिनिटात हा चित्रपट संपतो पण आपला ठसा मागे ठेवूनच, आणि याचे श्रेय जाते ते चित्रपटाची दिग्दर्शिका शोनाली बोस हिला. राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी जातीवरून, धर्मावरून लोकांना चिथवतात, आपल्या हातातील माणसाकडून हत्या घडवून आणतात आणि माथी भडकावली जातात. मग माणूस बेभान होऊन आपल्याच माणसाचि कत्तल करत फिरतो; आपल्या देशावर तर हे संकट अनेकदा कोसळले आहे. “अमू” चे कथानक यावरच आहे, पण “अमू” ह्या पलीकडे जाऊन विचार करायला लावतो. जाती व धर्माच्या नावाखाली जेव्हा दंगली तेव्हा हजारो निरपराध लोक ठार होतात, लाखोंचे संसार उद्ध्वस्त होतात आपण ह्या घटना बातम्या म्हणून पहातो, ऐकतो, वाचतो आपल्या जिवंतपणाचे द्योतक म्हणून क्षणभर तीव्र दुख: व संताप व्यक्त करत तावात

किल्ले वज्रगड आणि किल्ले पुरंदर : मीमकर-माबोकर मावळ्यांची एकत्रीत चढाई

Image
मागच्या आठवड्यात म्हणजे १ जुलै ला किल्ले पुरंदर व किल्ले वज्रगडला मीमराठी वर्षाविहार निमित्ताने भेट दिली त्याचा वृत्तांत श्री. विशाल कुलकर्णी यांनी मीमराठी वर टाकला होता त्यांच्या परवानगीने मी तो येथे देत आहे. वृत्तांत "हॅलो, कुठेयस बे?" "अरे नर्‍ह्यातच आहे, सॅंडविच घ्यायलो बे. ते मंदार आणि बाकीचे लोक पोचलेत तिथे. मी पण येतोच आहे दहा मिनीटात. समीर रानडे आणि त्याचा मित्र पिंगूबरोबर त्यांच्या गाडीने आधीच येवुन पोचलेत." "वंडर सिटीपाशीच ना?" "यस्स." आम्ही बाईकला किक मारली , गिअर टाकायच्या आधी मागे गृहमंत्री बसलेत ना हे बघून घेतलं. हो; नाहीतर परत " तुझा वेंधळेपणा कधी कमी होणार आहे कोण जाणे? " हे सुभाषित ऐकुन घ्यावं लागलं असतं. वंडर सिटीपाशी पोचलो तर तिथे एक छोटासा टँपो उभा होता, ते छोटा हत्ती का काय म्हणतात ना तसला. म्हणलं "च्यायला सम्याने, फोर्डची गाडी घेतली होती ती विकली काय?" पण आजुबाजुला कोणीच दिसेनात तेव्हा श्रीश्री रमतारामप्रभुंना फोन लावला. त्यांनी सांगितलं आम्ही इथे 'राज्याच्या' (श्रीमान राजेश