माझा गुरु

             आयुष्यातला प्रत्येक क्षण काही ना काही शिकवत असतोच जीवनात अनेक गुरु येतात, प्रत्येकाची शिकविण्याची पध्दत वेगळी असते पण आयुष्यभर संस्कारांवर मोहोर उमटवते ती पहिल्या गुरुची शिकवणी!!!
हि पोस्ट माझ्या पहिल्या गुरूसाठी आज ज्यांच्यामुळे मी आज लिहायाला शिकली (म्हणजे मी काही मोठी लेखिका नाही पण जे काही लिहिते ते.... असो ) लोक म्हणतात कि पहिली गुरु म्हणजे आई असते पण मी गर्वाने सांगते माझे पहिले गुरु म्हणजे माझे दादा (वडील). ( माझी आई हि पण माझी उत्तम मार्गदर्शक आहे पण... पहिल्या गुरूचा मन दादानांच)

                  माझं वक्तृत्व आणि माझं लेखन ज्यांनी घडवले ते दादा घडवलेच म्हणावे लागेल (मी घरात शेंडेफळ त्यामुळे फार आळशी आणि झोपेचा छंद तेव्हापासून जडलेला आजही कायम आहे.... असो.) आमच्या गुरूंना म्हणजेच दादांना वक्तृत्वाची देणगी आजोबामुळे लाभलेली पण त्यामुळे त्यांचे वाचन खूप आणि अभ्यासही, लहानपणी खूप बक्षिसे मिळविली होती त्यांनी. आमचे थोरले बंधू आजी – आजोबांकडे मुंबईला शिकण्यास होते, आणि मी आई – दादांसोबत गावाकडे त्यामुळे वक्तृत्वाचे प्रयोग आमच्यावर झाले.

                   पण त्या प्रयोगांचा फायदा फार झाला, उच्चार व आवाजातली स्पष्टता, कोणत्या शब्दावर किती जोर द्यायचा त्यामुळे कसा अर्थ फिरतो हे कळाले. वक्तृत्व स्पर्धेसाठी तर खूप मेहनत घ्यायचे. आधी माझ्यासाठी भाषण तयार करणे मग तो स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करणे, मला ते पूर्णपणे ऐकवणे, माझ्याकडून पाठ करवून घेणे, माझ्या आवाजात ते भाषण रेकॉर्ड करणे व शांतपणे मला ते ऐकवणे, दोघांच्या उच्चारातील फरक चेक करणे, आणि जर ते बरोबर जमले नसतील तर त्यांनी त्यांचे रेकॉर्ड  केलेले भाषण ऐकवत  व त्यानंतर माझे रेकॉर्ड झालेले भाषण ऐकवत. दोघांच्या उच्चार व शब्दांवरील  जोर देण्याच्या पद्धतीतील फरक समजावून सांगत. पुन्हा पाठ करून घेत. बर नुसतीच घोकमपट्टी करायला न लावता त्या विषयीचा इतिहास समजवून सांगत आणि मला तो समजेपर्यंत समजावत.

                   लहानपणी भाषण लिहून देत खरे पण जशी मोठी झाली तशी माझी भाषणे लिहिणे आणि त्यांची तयारी कशी करायचे ते माझे मलाच करायला शिकविले. तिकडूनच मग ह्या लेखनाचा छंद लागला. आयुष्यातला पहिला लेख म्हणजे वक्तृत्व स्पर्धेसाठी नाही तर कॉलेज मासिकासाठी लिहिला होता रॅगिंग वर ते हि त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता करण त्यावेळी ते बाहेर होते कामानिम्मित. ते परत आल्यावर त्यांना तो दाखविला. संदर्भ कुठून घेतलेस? हा एकाच प्रश्न होता आणि पेपर मध्ये आलेल्या बातम्या तसेच कॉलेज सरांना विचारलेली माहिती. त्यावर छान आहे एवढीच प्रतिक्रिया होती.

                  आज जेव्हा मी ब्लॉग वर लेख प्रकाशित करते त्यांची माहिती भेटणारया प्रत्येकाला सांगतात व लिंक देतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यातली चमक सांगून जाते कि मझ्याबद्दल किती अभिमान आहे ते. आणि हाच अभिमान एक नवीन जबाबदारीची जाणीव करून देतो हे सातत्य टिकवायचा आहे. आणि डोक्यात एकाच गोष्ट येते ती म्हणजे Champions are those who can get themselves to constantly improve & consistently perform at peak level.

थांक्यू दादा!!


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!