"प्रवाहातील रंगभूमी" चा पहिला भाग येथे वाचा. आधुनिक रंगभूमी मराठी रंगभूमी खर्या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे विष्णू अमृत भावे यांनी “ सीतास्वयंवर ” या नाटकाचा प्रयोग सांगलीकरांच्या प्रेरणेने केला. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले. नृत्य , गायन , अभिनय , देव , गंधर्व , अप्सरा , ऋषी , विदूषक इ.नी युक्त अशी ही पौराणिक नाटके सर्वसामान्यांची करमणूक करू लागली. त्या काळच्या नाटकांचे स्वरूप : प्रथम रंगभूमीवर आपल्या साथीदारांसह सूत्रधार येत असे. मृदंग व पखवाज वाजवले जात असत. मंगलाचरण , ईशस्तवन झाल्यावर विदूषक आचरट कोट्या करुन विनोद करत असे. त्यानंतर नाटकाचा विषय काय आहे हे सांगून कागदाच्या लगद्यापासून सोंड तयार केलेला गणपती सोंड हलवत यायचा. गणपतीचे स्तवन झाले की कथानकाच्या अनुषंगाने पात्रांकडून संवाद आणि कृती यातून नाटक उभे राहात असे. अभंग , ओवी , कटाव आणि वेगवेगळी काव्यवृत्ते यांचा आधार घेत नाटक सादर केले जात असे. पौराणिक नाटक